शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा मोर्चा

By admin | Updated: July 13, 2017 20:16 IST

अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिका येथून दुपारी १२ वाजता हा मोर्चा निघून भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन मागण्यांचे निवेदन आयुक्त गिरिराज शर्मा यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त गिरिराज शर्मा यांनी पेन्शनधारकांच्या मागण्या शासनाकडे पाठवून आलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, तसेच येत्या नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था बँकांमध्येच करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कामगार नेते देवराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला. राजेंद्र भातुलकर, एम. टी. इंगळे, गोपाल मांडेकर, मुकुंद गावंडे, डी. बी. भुसे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक रमेश गायकवाड यांनी केले. मोर्चात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमधून आलेले पेन्शनधारक सहभागी झाले होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी हिवराळे, शर्मा, पंत, देशमुख, कुटे, गणगणे, देवरे, दही, आढाव, व्यवहारे, मारोडे, अंधारे, काळे, फिरगे, भराटे, अंबादास ठाकरे, आर. एन. राऊत आदींनी सहकार्य केले.या आहेत मागण्या- महिना ६५०० रुपये पेन्शन व महागाई भत्ता.- कोशियारी समितीच्या शिफारशी अंतरिम वाढ म्हणून लागू करा.- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा.- वेटेज पेमेंट पूर्ण करा.- विधवांना पतीच्या वेटेजची रक्कम द्या.- विकलेल्या पेन्शनची १०० महिन्यांमध्ये भरपाई करा.- पेन्शनधारकांना सरकारी खर्चाने ई.एस.आय. लागू करा.- पेन्शनधारकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ द्या.- पेन्शन खात्याला झीरो बॅलेन्सची सुविधा सुरू ठेवा.