शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठाने घडविले उद्योजक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना ...

अकोला : शेतीपूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील एकमेव ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरच्या माध्यमातून निवड करून प्रशिक्षण दिले जात असून प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारद्वारे २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसाह्य मिळत आहे. आतापर्यंत राज्यातील १३ जणांना अर्थसाह्य प्राप्त झाले आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे. हे इंक्युबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. या योजनेंतर्गत नवउद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडिंग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरित करण्यासाठी सीड स्टेज फंडिंग प्रोग्रामचे आयोजन केले जाते. कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या उत्पादनांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक साह्य पुरविणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सेंटरमार्फत १३ जणांची निवड झाली आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा या जिल्ह्यांतील लाभार्थींचा समावेश आहे.

--बॉक्स--

इंक्युबेशन सेंटरतर्फे मिळतात या सुविधा

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नवउद्योजकांना ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्यांचे प्रशिक्षण, विशेष तज्ज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ट तांत्रिक मार्गदर्शन, इंक्युबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येत आहेत.

--बॉक्स--

तीन टप्प्यांत अर्थसाह्य

या सेंटरमार्फत निवड झालेल्या व्यक्तीला तीन टप्प्यांत अर्थसाह्य मिळते. पहिल्या टप्प्यात ४०, दुसऱ्या टप्प्यात ४० व तिसऱ्या टप्प्यात २० टक्के निधी मिळतो. त्यावेळी त्या व्यक्तीला पुढील वर्षभरात काय काम करणार असल्याची विचारणा केली जाते. यामध्ये काही अडचण आल्यास सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.

--बॉक्स--

दुसऱ्या तुकडीत ३४ जणांचा समावेश

कृषी आधारित उद्योग उभा करण्यासाठी तीन सादरीकरण आवश्यक आहेत. पहिल्या तुकडीत १३ जणांची निवड झाल्यानंतर आता दुसऱ्या तुकडीत ३४ जणांची तिसऱ्या टप्प्यातील सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

--बॉक्स--

...अन्यथा मशनरी जप्तीची कारवाई

उद्योग उभा करताना प्रशिक्षणार्थी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास पुढील अर्थसाह्य थांबविता येते. याबाबत त्या व्यक्तीसोबत करार केला जातो. तसेच मशनरी जप्तीची कारवाईसुद्धा करण्यात येऊ शकते. ही कारवाई करण्याची वेळ येऊ नये, याकरिता सेंटरमार्फत वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते.

--कोट--

आतापर्यंतच्या योजनांमध्ये ही योजना संजीवनी आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, याकरिता सेंटरमार्फत योग्य मार्गदर्शन केल्या जाईल.

डॉ. संतोष गहूकर, सीईओ व हेड, ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर, डॉ. पंदेकृवि.