शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला पोलिस सुरक्षा नाही!

By admin | Updated: August 12, 2014 00:57 IST

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पोलिस सुरक्षा पुरविण्यास पुन्हा एकदा पोलिस प्रशासन कुचकामी ठरले.

अकोला : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान पोलिस सुरक्षा पुरविण्यास पुन्हा एकदा पोलिस प्रशासन कुचकामी ठरले. सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यासाठी गेलेल्या मनपा अधिकार्‍यांना सोमवारी दिवसभर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात ताटकळत ठेवण्यात आले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली बोळातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठिण झाले. अतिक्रमणाच्या विळख्यातून शहराची सुटका करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी २६ जूनपासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली. यादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस सुरक्षेची गरज लक्षात घेता, पोलिस प्रशासनासोबत तसा पत्रव्यवहार केला. त्यानुसार पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली. पंढरपूर यात्रेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त व जिल्ह्यात चोरट्यांना लगाम घालण्यासाठी गस्तीसाठी पोलिस तैनात केल्याची सबब पुढे करीत पोलिस सुरक्षा पुरविण्यास नकार देण्यात आला. त्यावर मनपाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम बंद न ठेवता, कारवाई सुरूच ठेवली. यादरम्यान, ११ ऑगस्टपासून अतिक्रमण निर्मूलन धडक मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला. याकरिता पोलिस सुरक्षा पुरविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासोबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. या मुद्यावर आजपर्यंतही पोलिस प्रशासनाने ठोस निर्णय न घेतला नाही. अखेरीस ११ ऑगस्ट रोजी अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे यांनी पोलिस सुरक्षेच्या मागणीसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. त्यांनी सादर केलेल्या अर्जावर पोलिस प्रशासनाने सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय दिला नाही.