शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

कृषी विद्यापीठ कर्मचार्‍यांचा संप सुरू

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.

अकोला : रोजंदारी मजुरांना योग्य मजुरी देण्यात यावी, ट्रॅक्टरचालक व प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी २५ जूनपासून धरणे आंदोलन करणार्‍या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात पेरणीसह कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा कृषी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे. कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती संशोधन केंद्र, वणीरंभापूर येथील मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्रासह सर्वच ब्लॉकवरील कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गत सात दिवसांपासून कृषी विद्यापीठाची प्रक्षेत्रावरील कामे ठप्प आहेत. ट्रॅक्टर, वाहनचालकांना ५00 रुपये, रोजंदारी मजुरांना नवीन रोजंदारी वेतनाप्रममाणे ३५0 रुपये देण्यात यावेत, जेव्हापासून नवीन मजुरी सुरू झाली तेव्हापासूनची थकबाकी देण्यात यावी, आठवड्याच्या आठवड्याला मजुरांना पगार देण्यात यावे, ३0 वर्ष काम करणार्‍या मजुरांना सेवेत कायम करावे, वाहनचालकांची भरती करताना ती केवळ कृषी विद्यापीठांतर्गतच करावी, नवीन प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्यात यावे, स्वइच्छेने काम सोडणार्‍या कर्मचार्‍यांना उपदानाची रक्कम लवकर देण्यात यावी, आदी मागण्यासाठी या कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण न केल्यास या हंगामात कोणतीच कामे करणार नसल्याचा इशारा या कर्मचार्‍यांनी दिला असला तरी, कृषी विद्यापीठ प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कृषी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तूर्तास या विषयावर त्यांनी बोलण्याचे टाळले. (प्रतिनिधी)