शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी जागर मंचचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात ‘एल्गार’ पुकारत काळे कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने ...

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात ‘एल्गार’ पुकारत काळे कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्यांमधील तरतुदीनुसार कंत्राटी शेतीच्या कायद्यात कंत्राटदारास नुकसान झाल्यास सातबारावर बोजा चढविण्याची तरतूद असून ती शेतकऱ्यांना अमान्य आहे. तसेच कंत्राटी शेतीच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक आहे. झालेला दंड शेतकऱ्याने विहित मुदतीत न भरल्यास अधिकचा दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. बाजार समिती १९६४ च्या कायद्याप्रमाणे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या प्रत्येक शेतमालाच्या व्यवहारास आर्थिक संरक्षण आहे; मात्र केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याप्रमाणे व्यापाऱ्यास लुटीची मुभा देण्यात आली आहे. नवीन कायद्याप्रमाणे शेतकऱ्यास स्वत:वरील अन्यायासंदर्भात दाद मागण्याकरिता महसूल यंत्रणेकडे निर्माण होणाऱ्या वांधा समितीकडे जावे लागणार असून, तक्रारीचे योग्य पद्धतीने समाधान झाले नाही, तरीही शेतकरी यंत्रणेची तक्रार कोठेही करू शकणार नाही, आदी प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पारित केलेले काळे कृषी कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे, रवी अरबट, कृष्णा अंधारे, गजानन अहमदाबादकर, दिलीप मोहोड, ज्ञानेश्वर सुलताने, डाॅ. प्रशांत अढाऊ, डाॅ. सुभाषचंद्र कोरपे, राजू मंगळे, अन्सार कुरेशी आदींसह जिल्ह्यातील १११ गावांमधील शेतकरी सहभागी झाले होते.

अन् आंदोलक शेतकऱ्यांनी सोडल्या शिदोऱ्या!

कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी जागर मंचच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी शिदोऱ्या आणल्या होत्या. आंदोलनादरम्यान दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि कांदा व भाकर खाऊन केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला.

..............फोटो............