शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी जागर मंचचा ‘एल्गार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात ‘एल्गार’ पुकारत काळे कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने ...

अकोला : केंद्र सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांविरोधात ‘एल्गार’ पुकारत काळे कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.

केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कृषी कायद्यांमधील तरतुदीनुसार कंत्राटी शेतीच्या कायद्यात कंत्राटदारास नुकसान झाल्यास सातबारावर बोजा चढविण्याची तरतूद असून ती शेतकऱ्यांना अमान्य आहे. तसेच कंत्राटी शेतीच्या कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक आहे. झालेला दंड शेतकऱ्याने विहित मुदतीत न भरल्यास अधिकचा दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे. बाजार समिती १९६४ च्या कायद्याप्रमाणे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात केलेल्या प्रत्येक शेतमालाच्या व्यवहारास आर्थिक संरक्षण आहे; मात्र केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याप्रमाणे व्यापाऱ्यास लुटीची मुभा देण्यात आली आहे. नवीन कायद्याप्रमाणे शेतकऱ्यास स्वत:वरील अन्यायासंदर्भात दाद मागण्याकरिता महसूल यंत्रणेकडे निर्माण होणाऱ्या वांधा समितीकडे जावे लागणार असून, तक्रारीचे योग्य पद्धतीने समाधान झाले नाही, तरीही शेतकरी यंत्रणेची तक्रार कोठेही करू शकणार नाही, आदी प्रकारचे मुद्दे समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पारित केलेले काळे कृषी कायदे तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत पंतप्रधानांकडे सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे, रवी अरबट, कृष्णा अंधारे, गजानन अहमदाबादकर, दिलीप मोहोड, ज्ञानेश्वर सुलताने, डाॅ. प्रशांत अढाऊ, डाॅ. सुभाषचंद्र कोरपे, राजू मंगळे, अन्सार कुरेशी आदींसह जिल्ह्यातील १११ गावांमधील शेतकरी सहभागी झाले होते.

अन् आंदोलक शेतकऱ्यांनी सोडल्या शिदोऱ्या!

कृषी कायद्यांविरोधात धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी जागर मंचच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी शिदोऱ्या आणल्या होत्या. आंदोलनादरम्यान दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शेतकऱ्यांनी शिदोऱ्या सोडल्या आणि कांदा व भाकर खाऊन केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कृषी कायद्यांना विरोध दर्शविला.

..............फोटो............