शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या आशा पल्लवित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:17 IST

नागपूर खंडपीठात होणार असलेल्या याचिकेच्या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत.

अकोला : तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (मराविमं) तथा आताच्या तिन्ही सरकारी वीज कंपन्यांमधील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन मिळावे, या मागणीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेली पेन्शन याचिका अंतिम सुनावणीसाठी मंजूर झाल्याने या कर्मचाºयांच्या सेवानिवृत्ती वेतन मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नागपूर खंडपीठात होणार असलेल्या याचिकेच्या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत.विद्युत मंडळाने ३१ डिसेंबर रोजी ठराव मंजूर करून १ जानेवारी १९७४ किंवा त्यानंतर निवृत्त होणाºया वीज कर्मचाºयांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र शासनानेही या योजनेची तपासणी केल्यानंतर २७ जानेवारी २००१ रोजी विधानसभेत निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मात्र या योजनेचे पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे म. रा. विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष बी. के. करंदीकर व इतरांनी निवृतीवेतन योजनेसाठी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपरोक्त याचिकेवर १९ नोव्हेंबर रोजी निर्णय देताना विद्युत मंडळ व संबंधित उत्तराधिकारी कंपन्यांनी आपसात चर्चा करून योजनेच्या अंमलबजावणीबाबत तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेशित केल्याने सर्व कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु तीन महिन्यांत कोणत्याही हालचाली न झाल्यामुळे मूळ अर्जदारांनी खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली. त्यानंतर ६ फेब्रुवारी २००८ रोजी सूत्रधारी कंपनीच्या संचालकांची बैठक होऊन मंडळाची आर्थिक अडचण व महाराष्ट्र शासन योजनेचा बोजा घ्यायला तयार नसल्याने योजना लागू करण्यास असमर्थ असल्याचे कळविण्यात आले. अवमानना याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी पेन्शनविषयक सर्वसमावेशक मुद्दे सामील करून नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुषंगाने याचिकाकर्त्यांनी याचिका क्र. ६९५०/२०१८ दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय एस. एच. शुक्रे व एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर १० जुलै रोजी सुनावणी होऊन ही याचिका अंतिम सुनावणीसाठी मंजूर करण्यात आली. ज्येष्ठ विधिज्ञ एम. जी. भांगडे व गौरी वेंकटरमन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. आता लवकरच याचिकेवर सुनावणी होणार असल्याने वीज कंपन्यांमधील सेवानिवृत्त व सेवारत कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाHigh Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरण