शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जनता दरबारात वीज ‘मीटर’

By admin | Updated: May 20, 2017 01:21 IST

अकोला: महावितरणचा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महावितरणचा कारभार प्रचंड ढेपाळला असून, पैसे भरूनही लोकांना वीजपुरवठा मिळत नाही. काही ठिकाणी तर ग्राहकांच्या घरी केवळ विद्युत मीटर आणून ठेवले जातात. महावितरणचा हा भोंगळ कारभार एका ग्रामस्थाने ऊर्जामंत्र्यांच्या दरबारात चक्क विद्युत मीटर आणून चव्हाट्यावर आणला. बाळापूर तालुक्यातील कळंबा येथील सुभाष उगले हे चक्क हातात विद्युत मीटर घेऊन आले व आपल्याला आतापर्यंत विद्युत पुरवठा मिळाला नसल्याची तक्रार ऊर्जामंत्र्यांकडे केली. दारिद्र्यरेषेखालील योजनेंतर्गत आपल्याला वीज जोडणी मंजूर झालेली असतानाही वीज कर्मचारी जोडणी करून देण्यास तयार नसून, केवळ विद्युत मीटर घरात आणून ठेवल्याचे उगले यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर गावात आणखी १५ जणांच्या घरात असे मीटर ठेवलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकार पाहून ऊर्जामंत्री चकित झाले. त्यानंतर संबंधित उपकेंद्राचा कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना मंचावर बोलावून सदर वीज ग्राहकाच्या हस्ते त्यांना हे मीटर बक्षीस म्हणून देण्यास सांगितले. यावेळी महावितरणचे अधिकारी चांगलेच खजील झाले. सायंकाळपर्यंत सुभाष उगले व इतरांना वीजपुरवठा जोडून देण्याचे आदेश यावेळी ऊर्जामंत्र्यांनी दिले.अधिकाऱ्यांची संपत्ती तपासा!सरकारकडून पगार व इतर सुविधा घेतल्यानंतरही महावितरणचे अनेक अधिकारी लोकांची कामे करीत नाहीत. जनतेच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढतच आहेत. महावितरणच्या काही अभियंत्यांचे कंत्राटदारांशी साटेलोटे असल्याच्या तक्रारी असून, त्याबाबतचे पुरावेही आहेत. अनेक बडे अधिकारी काही दिवसांत श्रीमंत झाले आहेत. आर्थिक-देवाण-घेवाणीशिवाय हे शक्य नसल्यामुळे येत्या काही दिवसांत महावितरणच्या विदर्भातील सर्वच अधिकाऱ्यांच्या संपत्तीचे रेकॉर्ड तपासण्याचे आदेशच यावेळी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपासून ते सहायक व कनिष्ठ अभियंत्यांपर्यंतच्या सर्वांच्या संपत्तीच्या नोंदी तपासा व त्याबाबतचा अहवाल पालकमंत्र्यांना सादर करा, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.