शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 02:23 IST

महावितरणची धडक मोहीम; नाईलाजास्तव करावी लागणार कारवाई.

अकोला, दि. ४- वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने संपूर्ण राज्यात धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांवर विशेष जोर देण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांवरही नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.पाणीपुरवठा योजना या ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येतात. या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजना नागरी सुविधांमध्ये मोडत असल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला शक्य होत नाही. तथापि, थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे ४ प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात कुचराई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांवरही वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ७ कोटींवरजिल्हय़ात एकूण ८९८ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेद्वारा चालविल्या जातात. या योजनांची वीज देयके राज्य शासनाच्या निधीतून भरल्या जातात. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांकडे २0१६ अखेरपर्यंंत जवळपास ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा करण्याबाबत महावितरणकडून शासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही वीज देयक न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नाईलाजास्तव खंडीत करावा लागणार असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले. अकोला परिमंडळातील तीन्ही जिल्हय़ात ही थकबाकी ५0 कोटी आहे.निर्माण होऊ शकते कृत्रिम पाणीटंचाईयावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जिल्हय़ातील जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच भूगर्भातील पाणीपातळीही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे आशादायक चित्र सध्या तरी आहे; परंतु थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांना जलाशयांमध्ये पाणी असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.