शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 02:23 IST

महावितरणची धडक मोहीम; नाईलाजास्तव करावी लागणार कारवाई.

अकोला, दि. ४- वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने संपूर्ण राज्यात धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांवर विशेष जोर देण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांवरही नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.पाणीपुरवठा योजना या ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येतात. या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजना नागरी सुविधांमध्ये मोडत असल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला शक्य होत नाही. तथापि, थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे ४ प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात कुचराई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांवरही वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ७ कोटींवरजिल्हय़ात एकूण ८९८ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेद्वारा चालविल्या जातात. या योजनांची वीज देयके राज्य शासनाच्या निधीतून भरल्या जातात. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांकडे २0१६ अखेरपर्यंंत जवळपास ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा करण्याबाबत महावितरणकडून शासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही वीज देयक न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नाईलाजास्तव खंडीत करावा लागणार असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले. अकोला परिमंडळातील तीन्ही जिल्हय़ात ही थकबाकी ५0 कोटी आहे.निर्माण होऊ शकते कृत्रिम पाणीटंचाईयावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जिल्हय़ातील जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच भूगर्भातील पाणीपातळीही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे आशादायक चित्र सध्या तरी आहे; परंतु थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांना जलाशयांमध्ये पाणी असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.