शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी कापणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 02:23 IST

महावितरणची धडक मोहीम; नाईलाजास्तव करावी लागणार कारवाई.

अकोला, दि. ४- वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महावितरणने संपूर्ण राज्यात धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व उपसा सिंचन योजनांवर विशेष जोर देण्यात येत असून, थकबाकी असलेल्या जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांवरही नाईलाजास्तव कारवाई करावी लागणार असल्याची माहिती महावितरणमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे.पाणीपुरवठा योजना या ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येतात. या योजनांसाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजना नागरी सुविधांमध्ये मोडत असल्याने त्यांच्याकडे थकबाकी वाढली तरी त्यांचा वीजपुरवठा खंडित करणे महावितरणला शक्य होत नाही. तथापि, थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे ४ प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात कुचराई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या अनुषंगाने जिल्हय़ातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांवरही वीजपुरवठा खंडित केला जाण्याची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनांची थकबाकी ७ कोटींवरजिल्हय़ात एकूण ८९८ पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिकेद्वारा चालविल्या जातात. या योजनांची वीज देयके राज्य शासनाच्या निधीतून भरल्या जातात. जिल्हय़ातील पाणीपुरवठा योजनांकडे २0१६ अखेरपर्यंंत जवळपास ७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी जमा करण्याबाबत महावितरणकडून शासकीय यंत्रणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानंतरही वीज देयक न भरणार्‍या पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा नाईलाजास्तव खंडीत करावा लागणार असल्याचे महावितरणमधील उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले. अकोला परिमंडळातील तीन्ही जिल्हय़ात ही थकबाकी ५0 कोटी आहे.निर्माण होऊ शकते कृत्रिम पाणीटंचाईयावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जिल्हय़ातील जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा आहे. तसेच भूगर्भातील पाणीपातळीही समाधानकारक आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे आशादायक चित्र सध्या तरी आहे; परंतु थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित झाला तर नागरिकांना जलाशयांमध्ये पाणी असतानाही कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.