शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर काळाची गरज - एस. पी. काळे

By admin | Updated: March 20, 2015 01:13 IST

अकोला येथे ‘पारंपरिक आणि जैवतंत्रज्ञान पद्धतीने पिकांचा विकास’ परिसंवादाचे उद्घाटन.

अकोला : अणुतंत्रज्ञान व त्याचे शास्त्र याविषयी समाजात प्रचंड नकारात्मकता आहे; पण खर्‍या अर्थाने कृषी आणि तत्सम शास्त्राच्या विकासाकरिता अणुतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. काळे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने ह्यपारंपरिक आणि जैवतंत्रज्ञान पद्धतीने पिकांचा विकासह्ण या विषयावर आयोजित १६ व्या वसंतराव नाईक स्मृती राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन १९ मार्च रोजी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काळे यांनी मार्गदर्शन केले. भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे धावत आहे. तो सुख-शांती विसरला आहे. मनुष्यामध्ये नकारात्मकतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सुख-शांती हवी असेल, तर ही नकारात्मकता सोडून सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा लागेल, असे भावनिक आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. दोन दिवसीय परिसंवादाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केले. याप्रसंगी अमेरिकेच्या टेक्सास तंत्र विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉ. डेव्हिड सी. वीनडॉर्फ, आयसीएआरचे (बियाणे) माजी साहाय्यक संचालक डॉ. एन. डी. जांभळे, एमपीकृविच्या डॉ. विद्या गुप्ता, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. दाणी म्हणाले, जैवतंत्रज्ञानात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने आाघाडी घेतली आहे. भविष्यातील या तंत्रज्ञानाची गरज ओळखून विद्यापीठाने जैवतंत्रज्ञान विषयामध्ये अभ्यासक्रम आणि अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना उच्च प्रतीचे तंत्रज्ञान व कृषी निविष्ठा सहजपणे उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.