शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:09 IST

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली.

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. लोकांनी ाास सहन करीत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या मेहनतीचा पैसा बँका, पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्समधून बदलून घेतला. नोटबंदीनंतर उद्भवलेली स्थिती ५० दिवसांनंतर आटोक्यात येईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष झाले; पण अजूनही त्याची झळ अकोल्यात कायम आहे. नोटाबंदीमुळे अकोल्यातील अनेक उद्योजकांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. यातून काही सावरले; मात्र काही व्यापारी-उद्योजक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही.नोटाबंदीनंतर समाजात आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अपेक्षा सरकारला होती; मात्र तसे झाले नाही. अनेकांनी टीका केली. काहींनी तर नोटाबंदीला काही विशिष्ट लोकांचा अजेंटा म्हटले. हे सर्व होत असले तरी सर्वसामान्य जनता आणि आणि व्यापारी उद्योजकांना या नोटाबंदीने काय दिले, हे जाणून घेतले आहे लोकमतने काही क्षेत्रातील गणमान्य व्यापाऱ्यांकडून. 

नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारावर प्रतिबंध लागले आहे. त्यामुळे प्रापर्टीत होणारी मोठी उलाढाल थांबली आहे. जंगम मालमत्ता घेताना होणारा व्यवहार आधी दिसत नव्हता; मात्र नोटाबंदीनंतर आणि जीएसटी लावल्याने अनेक व्यवहार दाखविणे क्रमप्राप्त झाले आहे. सोन्याची खरेदीही पूर्वीप्रमाणे कुणी करीत नाही. त्यामुळे नोटाबंदीची झळ ही कायम राहणार आहेच. कारण सर्व बदलत आहे, वेळ लागेल.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.- नोटाबंदी ज्या उद्देशाने सुरू झाली होती, ते उद्देश आता मागे पडले आहे. पूर्वी ५ टक्के लोक पेट्रोल पंपावरून आॅनलाइन व्यवहार करायचे. नोटाबंदीनंतर सहा महिने पॉज मशीनने आर्थिक व्यवहार केले. त्यामुळे ही टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र दोन वर्षांनंतर जर मागोवा घेतला तर आता केवळ २० टक्के लोक स्वाइप कार्ड वापरतात. याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे.- राहुल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असो. अकोला.- लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नोटाबंदीचा फायदा काय झाला हा विषय संशोधनाचा आहे; मात्र लोक आता आॅनलाइन व्यवहार करू लागले आहे. पूर्वीप्रमाणे कॅशचे व्यवहार लोक सहज करीत नाही. शासनाचा धाक निर्माण झाला आहे.- कमल आलिमचंदानी, उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDemonetisationनिश्चलनीकरण