शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:09 IST

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली.

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. लोकांनी ाास सहन करीत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या मेहनतीचा पैसा बँका, पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्समधून बदलून घेतला. नोटबंदीनंतर उद्भवलेली स्थिती ५० दिवसांनंतर आटोक्यात येईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष झाले; पण अजूनही त्याची झळ अकोल्यात कायम आहे. नोटाबंदीमुळे अकोल्यातील अनेक उद्योजकांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. यातून काही सावरले; मात्र काही व्यापारी-उद्योजक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही.नोटाबंदीनंतर समाजात आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अपेक्षा सरकारला होती; मात्र तसे झाले नाही. अनेकांनी टीका केली. काहींनी तर नोटाबंदीला काही विशिष्ट लोकांचा अजेंटा म्हटले. हे सर्व होत असले तरी सर्वसामान्य जनता आणि आणि व्यापारी उद्योजकांना या नोटाबंदीने काय दिले, हे जाणून घेतले आहे लोकमतने काही क्षेत्रातील गणमान्य व्यापाऱ्यांकडून. 

नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारावर प्रतिबंध लागले आहे. त्यामुळे प्रापर्टीत होणारी मोठी उलाढाल थांबली आहे. जंगम मालमत्ता घेताना होणारा व्यवहार आधी दिसत नव्हता; मात्र नोटाबंदीनंतर आणि जीएसटी लावल्याने अनेक व्यवहार दाखविणे क्रमप्राप्त झाले आहे. सोन्याची खरेदीही पूर्वीप्रमाणे कुणी करीत नाही. त्यामुळे नोटाबंदीची झळ ही कायम राहणार आहेच. कारण सर्व बदलत आहे, वेळ लागेल.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.- नोटाबंदी ज्या उद्देशाने सुरू झाली होती, ते उद्देश आता मागे पडले आहे. पूर्वी ५ टक्के लोक पेट्रोल पंपावरून आॅनलाइन व्यवहार करायचे. नोटाबंदीनंतर सहा महिने पॉज मशीनने आर्थिक व्यवहार केले. त्यामुळे ही टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र दोन वर्षांनंतर जर मागोवा घेतला तर आता केवळ २० टक्के लोक स्वाइप कार्ड वापरतात. याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे.- राहुल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असो. अकोला.- लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नोटाबंदीचा फायदा काय झाला हा विषय संशोधनाचा आहे; मात्र लोक आता आॅनलाइन व्यवहार करू लागले आहे. पूर्वीप्रमाणे कॅशचे व्यवहार लोक सहज करीत नाही. शासनाचा धाक निर्माण झाला आहे.- कमल आलिमचंदानी, उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDemonetisationनिश्चलनीकरण