शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:09 IST

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली.

अकोला: देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी १ हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातली गेली. लोकांनी ाास सहन करीत पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या मेहनतीचा पैसा बँका, पेट्रोल पंप आणि मेडिकल स्टोअर्समधून बदलून घेतला. नोटबंदीनंतर उद्भवलेली स्थिती ५० दिवसांनंतर आटोक्यात येईल, असे सरकारने म्हटले होते. मात्र नोटाबंदीच्या निर्णयाला आज दोन वर्ष झाले; पण अजूनही त्याची झळ अकोल्यात कायम आहे. नोटाबंदीमुळे अकोल्यातील अनेक उद्योजकांना कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. यातून काही सावरले; मात्र काही व्यापारी-उद्योजक अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही.नोटाबंदीनंतर समाजात आणि लोकांच्या मानसिकतेत बदल होईल, ही अपेक्षा सरकारला होती; मात्र तसे झाले नाही. अनेकांनी टीका केली. काहींनी तर नोटाबंदीला काही विशिष्ट लोकांचा अजेंटा म्हटले. हे सर्व होत असले तरी सर्वसामान्य जनता आणि आणि व्यापारी उद्योजकांना या नोटाबंदीने काय दिले, हे जाणून घेतले आहे लोकमतने काही क्षेत्रातील गणमान्य व्यापाऱ्यांकडून. 

नोटाबंदीमुळे दोन नंबरच्या व्यवहारावर प्रतिबंध लागले आहे. त्यामुळे प्रापर्टीत होणारी मोठी उलाढाल थांबली आहे. जंगम मालमत्ता घेताना होणारा व्यवहार आधी दिसत नव्हता; मात्र नोटाबंदीनंतर आणि जीएसटी लावल्याने अनेक व्यवहार दाखविणे क्रमप्राप्त झाले आहे. सोन्याची खरेदीही पूर्वीप्रमाणे कुणी करीत नाही. त्यामुळे नोटाबंदीची झळ ही कायम राहणार आहेच. कारण सर्व बदलत आहे, वेळ लागेल.- वसंत बाछुका, उद्योजक, अकोला.- नोटाबंदी ज्या उद्देशाने सुरू झाली होती, ते उद्देश आता मागे पडले आहे. पूर्वी ५ टक्के लोक पेट्रोल पंपावरून आॅनलाइन व्यवहार करायचे. नोटाबंदीनंतर सहा महिने पॉज मशीनने आर्थिक व्यवहार केले. त्यामुळे ही टक्केवारी ४० टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र दोन वर्षांनंतर जर मागोवा घेतला तर आता केवळ २० टक्के लोक स्वाइप कार्ड वापरतात. याचा आढावा सरकारने घेतला पाहिजे.- राहुल राठी, अध्यक्ष, पेट्रोल पंप असो. अकोला.- लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नोटाबंदीचा फायदा काय झाला हा विषय संशोधनाचा आहे; मात्र लोक आता आॅनलाइन व्यवहार करू लागले आहे. पूर्वीप्रमाणे कॅशचे व्यवहार लोक सहज करीत नाही. शासनाचा धाक निर्माण झाला आहे.- कमल आलिमचंदानी, उद्योजक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDemonetisationनिश्चलनीकरण