शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

निवडणुकीच्या कामातून शिक्षण मंडळ वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:42 IST

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत.

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षण मंडळातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या जाचातून सुटले आहेत.महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांनी २६ फेब्रुवारी २००८ रोजीच ही बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन, आयोजनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व त्यांचे नऊ विभागीय कार्यालयातील कर्मचाºयांच्या सेवा, त्यांच्या अधिकारात असलेली वाहने अधिग्रहित करू नये, असे बजावले आहे. परीक्षा काळात तसेच परीक्षा कालावधीच्या एक महिन्यापूर्वी व त्यानंतरच्या काळासाठी हे बंधन घालण्यात आले.त्याचसंदर्भात अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकाºयांना २८ जानेवारी रोजीच पत्र पाठविले आहे. त्यामध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आहे. लेखी परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दोन्ही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तसेच इतरही मंडळात कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना लोकसभा २०१९ निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पत्रात म्हटले आहे.

परीक्षा, निकालाच्या काळातच निवडणूकलोकसभेची निवडणूक प्रक्रिया परीक्षेच्या काळासोबतच निकाल लागण्याच्या धामधुमीतच होणार आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नागूपर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण (रत्नागिरी) या मंडळातील अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवा, वाहने निवडणूक कामातून वगळली जाणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक