शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामातून शिक्षण मंडळ वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:42 IST

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत.

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षण मंडळातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या जाचातून सुटले आहेत.महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांनी २६ फेब्रुवारी २००८ रोजीच ही बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन, आयोजनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व त्यांचे नऊ विभागीय कार्यालयातील कर्मचाºयांच्या सेवा, त्यांच्या अधिकारात असलेली वाहने अधिग्रहित करू नये, असे बजावले आहे. परीक्षा काळात तसेच परीक्षा कालावधीच्या एक महिन्यापूर्वी व त्यानंतरच्या काळासाठी हे बंधन घालण्यात आले.त्याचसंदर्भात अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकाºयांना २८ जानेवारी रोजीच पत्र पाठविले आहे. त्यामध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आहे. लेखी परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दोन्ही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तसेच इतरही मंडळात कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना लोकसभा २०१९ निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पत्रात म्हटले आहे.

परीक्षा, निकालाच्या काळातच निवडणूकलोकसभेची निवडणूक प्रक्रिया परीक्षेच्या काळासोबतच निकाल लागण्याच्या धामधुमीतच होणार आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नागूपर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण (रत्नागिरी) या मंडळातील अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवा, वाहने निवडणूक कामातून वगळली जाणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक