शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामातून शिक्षण मंडळ वगळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:42 IST

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत.

अकोला : येत्या काळातील दहावी, बारावीच्या परीक्षांचा काळ, त्यानंतर निकाल लावण्याची जबाबदारी मोठी असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या कर्मचाºयांसह वाहने लोकसभा निवडणूक कामासाठी घेऊ नये, असे निर्देश राज्याच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकाºयांना दिले आहेत. या आदेशामुळे शिक्षण मंडळातील अधिकारी-कर्मचारी निवडणुकीच्या जाचातून सुटले आहेत.महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाºयांनी २६ फेब्रुवारी २००८ रोजीच ही बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे नियोजन, आयोजनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व त्यांचे नऊ विभागीय कार्यालयातील कर्मचाºयांच्या सेवा, त्यांच्या अधिकारात असलेली वाहने अधिग्रहित करू नये, असे बजावले आहे. परीक्षा काळात तसेच परीक्षा कालावधीच्या एक महिन्यापूर्वी व त्यानंतरच्या काळासाठी हे बंधन घालण्यात आले.त्याचसंदर्भात अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी सर्व जिल्हाधिकाºयांना २८ जानेवारी रोजीच पत्र पाठविले आहे. त्यामध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान आहे. लेखी परीक्षा १ ते २२ मार्च या काळात होणार आहे. दोन्ही परीक्षा प्रक्रिया महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या दोन्ही परीक्षांचे निकाल १० जूनपूर्वी जाहीर करणे बंधनकारक आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तसेच इतरही मंडळात कर्मचारी संख्या अपुरी आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना लोकसभा २०१९ निवडणुकीची कामे देऊ नयेत, असे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी पत्रात म्हटले आहे.

परीक्षा, निकालाच्या काळातच निवडणूकलोकसभेची निवडणूक प्रक्रिया परीक्षेच्या काळासोबतच निकाल लागण्याच्या धामधुमीतच होणार आहे. त्यामुळे राज्यातील पुणे, नागूपर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण (रत्नागिरी) या मंडळातील अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवा, वाहने निवडणूक कामातून वगळली जाणार आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाElectionनिवडणूक