शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

खाद्य तेलाचे भाव वधारले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:54 IST

पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

- संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : देशात ओल्या दुष्काळाचे सावट असल्याने तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा परिणाम आता प्रत्यक्ष जाणवत असून, खाद्य तेल प्रतिकिलो मागे ३ रुपयांनी महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील फोडणी महागली आहे. वधारत असलेले खाद्य तेलाचे भाव जर आटोक्यात ठेवायचे असेल, तर खाद्य तेलापेक्षा भारताने तेलबियांची आयात करावी, अशी सूचनावजा मागणी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट)चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.अतिवृष्टीमुळे यंदा देशांतर्गत सर्वच पिकांची नासाडी झाली असून, सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाले आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या तेल उत्पादक राज्यातील स्थिती अत्यंत केविलवाणी आहे. कापूस आणि सोयाबीनचा पेरा दोन्ही राज्यांत जास्त असतो. दोन्ही तेलबियांतून मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची विक्री होते; मात्र दोन्ही राज्य पीछाडीवर पडल्याने आता तेलाचे भाव वधारण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या दरम्यान सोयाबीनच्या खाद्य तेलाचे भाव ७९ रुपये प्रतिकिलो होते. पंधरवड्याच्या आत तेलात ३ रुपयांची वाढ होत ते ८२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. ही वाढ पुढच्या तीन ते चार महिन्यांत आणखी दोन ते तीन रुपयांनी वधारण्याचे संकेत मिळत आहेत. तेल उत्पादनात आधीच आपला देश मागे असतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करावी लागते.यंदा त्याहूनही जास्त प्रमाणात आयात करण्याची वेळ येणार आहे, असे चित्र दिसत आहे. त्यावर पर्याय म्हणून ‘कॅट’चे राष्ट्रीय सचिव अशोक डालमिया यांनी यंदा खाद्य तेलाऐवजी तेलबियांची आयात करण्याचा प्रस्ताव शासनासमोर ठेवला आहे. तेलबियांच्या आयातीसोबतच तेल निर्मिती करणाऱ्यासाठी काही योजना शासनाने जाहीर कराव्यात आणि आॅइल इंडस्ट्रीजला उभारी द्यावी, असेही डालमिया यांनी सुचविले आहे. त्यावर शासन धोरण काय ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय