शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

By admin | Updated: December 18, 2014 01:02 IST

सलग तिस-या वर्षीही नरनाळा महोत्सव रद्द.

अकोला : अकोला जिल्ह्याचा सन्मान बनलेला नरनाळा महोत्सव सलग तिसर्‍या वर्षीही होण्याची चिन्हे नाहीत. मागील दोन वर्षांपासून नरनाळा महोत्सवाला जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. अकोला जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नरनाळा महोत्सव हा महत्त्वाचा दुवा बनला होता. २00७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकारातून नरनाळा महोत्सवाची मुहरूतमेढ रोवल्या गेली. अकोला जिल्ह्याचे वैभव असलेला नरनाळा किल्ला पाहताना परदेशी यांच्या मनात हा किल्ला पर्यटकांच्या नजरेपासून दूर असल्याचे लक्षात आले. पश्‍चिम महाराष्ट्रातील किल्लय़ांपेक्षा नरनाळा किल्लय़ाचे वैशिष्ट्ये खूपच वेगळे असल्याचे त्यांना दिसून आले. हा किल्ला पर्यटनाच्या नकाशावर आला पाहिजे, असे त्यांच्या मनात आले आणि नरनाळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेरुळ आणि एलिफंटा महोत्सवाच्या धर्तीवर नरनाळा महोत्सव सुरू करण्याचे मनात ठाणले आणि नरनाळा महोत्सवाचा जन्म झाला.जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी व जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव यांच्या सहकार्यातून पहिल्याच वर्षी नरनाळा महोत्सव अतिशय यशस्वी झाला. या महोत्सवामुळे नरनाळ्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला. परदेशी यांच्यानंतर मथ्थुकृष्णन यांनीदेखील नरनाळा महोत्सव आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यकाळात सलग तीन वर्ष नरनाळा महोत्सव झाला. त्या नंतरचे जिल्हाधिकारी परिमलसिंग यांनीदेखील नरनाळा महोत्सवाच्या आयोजनात रुची दाखविली आणि २0१२ मध्ये सलग सहाव्या वर्षी नरनाळा महोत्सव आयोजित केला गेला; परंतु २0१३ पासून नरनाळा महोत्सवाला ग्रहण लागले. यावर्षीदेखील नरनाळा महोत्सव होऊ शकला नाही. आता येणार्‍या वर्षातही होण्याची काही शक्यता नाही. अकोल्याचे ऐतिहासिक वैभव उजेडात आणणारा व आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा नरनाळा महोत्सव बंद झाल्यामुळे एक चांगली परंपरा खंडित झाली आहे.