शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

नरनाळा महोत्सवाला लागले ग्रहण

By admin | Updated: December 18, 2014 01:02 IST

सलग तिस-या वर्षीही नरनाळा महोत्सव रद्द.

अकोला : अकोला जिल्ह्याचा सन्मान बनलेला नरनाळा महोत्सव सलग तिसर्‍या वर्षीही होण्याची चिन्हे नाहीत. मागील दोन वर्षांपासून नरनाळा महोत्सवाला जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण सुटण्याची कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. अकोला जिल्ह्याला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नरनाळा महोत्सव हा महत्त्वाचा दुवा बनला होता. २00७ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या पुढाकारातून नरनाळा महोत्सवाची मुहरूतमेढ रोवल्या गेली. अकोला जिल्ह्याचे वैभव असलेला नरनाळा किल्ला पाहताना परदेशी यांच्या मनात हा किल्ला पर्यटकांच्या नजरेपासून दूर असल्याचे लक्षात आले. पश्‍चिम महाराष्ट्रातील किल्लय़ांपेक्षा नरनाळा किल्लय़ाचे वैशिष्ट्ये खूपच वेगळे असल्याचे त्यांना दिसून आले. हा किल्ला पर्यटनाच्या नकाशावर आला पाहिजे, असे त्यांच्या मनात आले आणि नरनाळा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी वेरुळ आणि एलिफंटा महोत्सवाच्या धर्तीवर नरनाळा महोत्सव सुरू करण्याचे मनात ठाणले आणि नरनाळा महोत्सवाचा जन्म झाला.जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी व जिल्हा प्रशासन आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्यासह स्थानिक आदिवासी बांधव यांच्या सहकार्यातून पहिल्याच वर्षी नरनाळा महोत्सव अतिशय यशस्वी झाला. या महोत्सवामुळे नरनाळ्याकडे पर्यटकांचा ओढा वाढला. परदेशी यांच्यानंतर मथ्थुकृष्णन यांनीदेखील नरनाळा महोत्सव आयोजनासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यकाळात सलग तीन वर्ष नरनाळा महोत्सव झाला. त्या नंतरचे जिल्हाधिकारी परिमलसिंग यांनीदेखील नरनाळा महोत्सवाच्या आयोजनात रुची दाखविली आणि २0१२ मध्ये सलग सहाव्या वर्षी नरनाळा महोत्सव आयोजित केला गेला; परंतु २0१३ पासून नरनाळा महोत्सवाला ग्रहण लागले. यावर्षीदेखील नरनाळा महोत्सव होऊ शकला नाही. आता येणार्‍या वर्षातही होण्याची काही शक्यता नाही. अकोल्याचे ऐतिहासिक वैभव उजेडात आणणारा व आदिवासी संस्कृतीला प्रोत्साहन देणारा नरनाळा महोत्सव बंद झाल्यामुळे एक चांगली परंपरा खंडित झाली आहे.