शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

कमी खा, खूप जगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:25 IST

अकोला : आयुष्य खूप सुंदर आहे.  चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो.  लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी कमी खा आणि खूप जगा, असा मोलाचा सल्ला रविवारी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिला. 

ठळक मुद्देनानासाहेब चौधरी यांचा सल्ला आयएमए व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आयुष्य खूप सुंदर आहे.  चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो.  लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी कमी खा आणि खूप जगा, असा मोलाचा सल्ला रविवारी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लठ्ठपणा - मधुमेह एक नवा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. चौधरी यांनी उपरोक्त सल्ला दिला.  यावेळी मंचावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, महाराष्ट्र बहुजन संघाचे प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, आयएमएचे सचिव डॉ. रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.  आपल्या एक तासाच्या व्याख्यानात डॉ. नानासाहेबांनी माणसाच्या जगण्याच्या चुकीच्या पद्धतीवर ताशेरे ओढले.  वारंवार एखादा रुग्ण आपल्याकडे यावा, असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही.  काही औषध कंपन्या आणि अन्न कंपन्यांच्या बदमाशांमुळे रुग्णांना चुकीचे सल्ले दिले जातात, त्यासाठी आता प्रत्येकाने जागरुक होण्याची गरज आहे.  आपल्या शरीराला ज्या घटकांची गरज असते, ते घटक किती प्रमाणात हवेत, त्यासाठी काय खायला हवे, याबद्दलची माहिती प्रत्येकाने जाणून घ्यायला हवी.  लठ्ठपणा वाढला, की त्यातून अनेक आजार जन्म घेतात.  शरीरातील साखर न जळल्याने तिचे रूपांतर चरबीत होते.  ही चरबी सातत्याने वाढत गेल्याने लठ्ठपणाची समस्या वाढते.  एखाद्याचे शरीर बाहेरून जेवढे लठ्ठ दिसते तेवढीच ती समस्या आतपयर्ंत शिरलेली असते.  लठ्ठपणा कमी करायचा असेल, तो टाळायचा असेल, तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त साखरेचा वापर होण्याबरोबरच साखर आपल्या शरीरात जाणारच नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले. व्याख्यानासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

गव्हातील सत्त्व झाले कमीपूर्वीच्या काळी गव्हामध्ये जे सत्त्व होते, ते आता राहिलेले नाही.  उत्पादन वाढविण्याच्या नादात या गव्हातील सत्त्व कमी झाले असून, त्यातील काबरेहायड्रेटचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.  हे काबरेहायड्रेट शरीरासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  एखादा आजार जडला, की आता आपण दुरुस्तच होऊ शकत नाही, असे न समजता नव्या उमेदीने कामाला लागा, असे ते म्हणाले.