शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कमी खा, खूप जगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:25 IST

अकोला : आयुष्य खूप सुंदर आहे.  चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो.  लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी कमी खा आणि खूप जगा, असा मोलाचा सल्ला रविवारी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिला. 

ठळक मुद्देनानासाहेब चौधरी यांचा सल्ला आयएमए व महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आयुष्य खूप सुंदर आहे.  चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो.  लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी कमी खा आणि खूप जगा, असा मोलाचा सल्ला रविवारी ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. नानासाहेब चौधरी यांनी दिला. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लठ्ठपणा - मधुमेह एक नवा दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. चौधरी यांनी उपरोक्त सल्ला दिला.  यावेळी मंचावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, महाराष्ट्र बहुजन संघाचे प्रदेश सरचिटणीस अँड. सुधाकर खुमकर, जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे, आयएमएचे सचिव डॉ. रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.  आपल्या एक तासाच्या व्याख्यानात डॉ. नानासाहेबांनी माणसाच्या जगण्याच्या चुकीच्या पद्धतीवर ताशेरे ओढले.  वारंवार एखादा रुग्ण आपल्याकडे यावा, असे कोणत्याही डॉक्टरला वाटत नाही.  काही औषध कंपन्या आणि अन्न कंपन्यांच्या बदमाशांमुळे रुग्णांना चुकीचे सल्ले दिले जातात, त्यासाठी आता प्रत्येकाने जागरुक होण्याची गरज आहे.  आपल्या शरीराला ज्या घटकांची गरज असते, ते घटक किती प्रमाणात हवेत, त्यासाठी काय खायला हवे, याबद्दलची माहिती प्रत्येकाने जाणून घ्यायला हवी.  लठ्ठपणा वाढला, की त्यातून अनेक आजार जन्म घेतात.  शरीरातील साखर न जळल्याने तिचे रूपांतर चरबीत होते.  ही चरबी सातत्याने वाढत गेल्याने लठ्ठपणाची समस्या वाढते.  एखाद्याचे शरीर बाहेरून जेवढे लठ्ठ दिसते तेवढीच ती समस्या आतपयर्ंत शिरलेली असते.  लठ्ठपणा कमी करायचा असेल, तो टाळायचा असेल, तर त्यासाठी शरीरातील अतिरिक्त साखरेचा वापर होण्याबरोबरच साखर आपल्या शरीरात जाणारच नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले. व्याख्यानासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

गव्हातील सत्त्व झाले कमीपूर्वीच्या काळी गव्हामध्ये जे सत्त्व होते, ते आता राहिलेले नाही.  उत्पादन वाढविण्याच्या नादात या गव्हातील सत्त्व कमी झाले असून, त्यातील काबरेहायड्रेटचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.  हे काबरेहायड्रेट शरीरासाठी घातक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  एखादा आजार जडला, की आता आपण दुरुस्तच होऊ शकत नाही, असे न समजता नव्या उमेदीने कामाला लागा, असे ते म्हणाले.