शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या खा अन् निरोगी राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

पावसाळ्यात मनुष्याची पचनक्षमता कमकुवत झालेली असते. त्यामुळे या काळात निसर्गाचे देण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. माळरानांवर ...

पावसाळ्यात मनुष्याची पचनक्षमता कमकुवत झालेली असते. त्यामुळे या काळात निसर्गाचे देण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे. माळरानांवर कर्टुले, चिवळ, आघाडा, पाथरी, आंबाडी, केणा, करवंद, चमकोऱ्याची पाने, फांदीची भाजी, तरोटा, आंबट चुका, वाघाटे, गवती चहा, गोबरू कंद, तांदुळजा, सुरण कंद, कुर्डू, गुळवेल, शेवगा अशा विविध रानभाज्या विपुल प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वच प्रकारच्या आरोग्यवर्धन आणि प्रतिकारशक्ती वाढविणारा हा रानमेवा वर्षातून एकदा तरी सेवन केलाच पाहिजे, असे अहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

या रानभाज्या आपल्याला ठाऊक आहेत का?

तरोटा

तरोट्याची भाजी उष्ण असते. त्यामुळे वात आणि कफदोष कमी होतो. तुरट चवीची ही भाजी मेथीच्या भाजीप्रमाणे बनवता येते. या भाजीने पोट साफ होते, शिवाय त्वचारोग होण्याचा धोका कमी असतो.

कर्टुले

थोडीशी कडवट चवीची ही भाजी यकृतासाठी उपयोगी आहे. पोट साफ होते आणि मूळव्याधासारखा त्रासही कमी करते. थोडी काटेरी कारल्यासारखी दिसते.

कुर्डू

पावसाळ्यात मिळणारी ही भाजी गावाकडच्या भागात आवडीने खाल्ली जाते. ही भाजी मूत्रमार्गाच्या समस्या कमी करते. जुनाट खोकला, कफ कमी करू शकते. ही भाजी आपल्या पालेभाज्यांप्रमाणेच बनवतात.

तांदुळजा

चवळी माठ असतो, तशीच ही माठाची भाजी दिसते. थोडी चिकट असणारी ही भाजी, श्रावण महिन्यातील सणात नैवेद्य दाखवण्यासाठी केली जाते. काही लोक याच भाजीला माठलाही म्हणतात.

सुरण कंद

ही भाजी म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा प्रकार आहे. मूळव्याधीवर अतिशय गुणकारी असून, अग्नीमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे आजारावर ही भाजी लाभदायक आहे.

या रानभाज्या झाल्या दुर्मीळ

वाघाटी

वाघाटीचा वेल काटेरी असून, ते झाडावर चढतात. अलीकडच्या काळात ही वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही वनस्पती उष्ण, उत्तेजक व पित्तनाशक असते. कफ प्रवृत्तीच्या व्यक्तींसाठी ही भाजी अतिशय गुणकारी मानली जाते.

हरसण

ही भाजी डोंगराळ भागात उगवते. पूर्वी प्रुचर मात्रेत आढळून येणारी ही भाजी आता दुर्मीळ झाली आहे. मेथीसारखी पाणे असलेली ही भाजी चविष्ट असून, अंगदुखीवर गुणकारी मानली जाते. काही औषधींमध्येही या भाजीचा वापर होतो.

रानभाज्या शक्तिवर्धक

विविध प्रकारच्या रानभाज्यांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली सर्वच प्रकारची जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या भाज्यामुळे पावसाळ्यात कमकुवत झालेली पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. शिवाय शरीराची रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. रानभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायकच आहे.

- अंजली वाघ, आहारतज्ज्ञ, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला