शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

हनिमूनला जाण्यासाठी हवी ई पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई पासची आवश्यकता होती. काहींना थंड ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे म्हणूनही पास हवा होता. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना ई पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ई पास मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखवले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई पासची मागणी केली.

---

३८ दिवसांत ८७६४ अर्ज

अकोल्यात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ८७६४ जणांनी ई पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे ३०८२ जणांना पास मंजूर करण्यात आला, तर ५६८२ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

---

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी १२३८ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे १२३८ जणांना ई पास देण्यात आले.

---

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई पास मिळवण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते.

आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र अनेक महाभाग गावात कंटाळलो म्हणून बाहेरगावी जायचे आहे असे सांगत आणि काहीजण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई पास मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

--

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साइटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालय असून त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येते.

अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकन दिले जाते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेकजण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई पास नाकारला जातो.

---