शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

हनिमूनला जाण्यासाठी हवी ई पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई पासची आवश्यकता होती. काहींना थंड ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे म्हणूनही पास हवा होता. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना ई पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ई पास मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखवले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई पासची मागणी केली.

---

३८ दिवसांत ८७६४ अर्ज

अकोल्यात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ८७६४ जणांनी ई पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे ३०८२ जणांना पास मंजूर करण्यात आला, तर ५६८२ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

---

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी १२३८ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे १२३८ जणांना ई पास देण्यात आले.

---

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई पास मिळवण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते.

आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र अनेक महाभाग गावात कंटाळलो म्हणून बाहेरगावी जायचे आहे असे सांगत आणि काहीजण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई पास मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

--

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साइटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालय असून त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येते.

अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकन दिले जाते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेकजण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई पास नाकारला जातो.

---