शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हनिमूनला जाण्यासाठी हवी ई पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने संबंधितांना शहराबाहेर जाता यावे म्हणून सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत ई - पासची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, काही महाभागांनी या सुविधेसाठी अफलातून कारणे सांगत ई पासची मागणी केली. काहींना हनिमूनसाठी ई पासची आवश्यकता होती. काहींना थंड ठिकाणी जायचे होते, तर काहींना गावात राहून कंटाळलो म्हणून बाहेरगावी जाऊन फिरून यायचे म्हणूनही पास हवा होता. अनेकांची कारणे अफलातून होती. त्यामुळे ६५ ते ७० टक्के ई पास ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आले आहेत.

कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे गावाबाहेर जाण्याची सोय नव्हती. मात्र ज्यांना अत्यावश्यक काम आहे, त्यांना ई पास मिळवून कोणत्याही ठिकाणी जाता येत होते. ई पास मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केले. मे महिन्यात २५ ते ३० टक्के अर्जदारांनी अंत्यसंस्काराला किंवा रुग्णालयात असलेल्या नातेवाइकांच्या भेटीला जाण्याचे कारण दाखवले, तर काही महाभागांनी हनिमून, सहज फिरायला जायचे आहे, म्हणून ई पासची मागणी केली.

---

३८ दिवसांत ८७६४ अर्ज

अकोल्यात २३ एप्रिल ते ३१ मे दरम्यान ८७६४ जणांनी ई पास मिळण्यासाठी अर्ज केला. अर्जामध्ये पुरावा म्हणून जोडलेली कागदपत्रे आणि कारण संयुक्तिक असल्यामुळे ३०८२ जणांना पास मंजूर करण्यात आला, तर ५६८२ जणांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले.

---

महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी १२३८ पास मंजूर

मंजूर झालेल्या अर्जामध्ये महाराष्ट्राबाहेर जाण्याची परवानगी मागणाऱ्यांची संख्या मोठी होती. संयुक्तिक कारणांमुळे १२३८ जणांना ई पास देण्यात आले.

---

कारणे तीच ती!

बहुतांश अर्जदार ई पास मिळवण्यासाठी एकसारखी कारणे सांगत होते.

आजारी असलेल्या व्यक्तीला भेटायला जाण्यासाठी किंवा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी ई पासची मागणी करीत असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. मात्र अनेक महाभाग गावात कंटाळलो म्हणून बाहेरगावी जायचे आहे असे सांगत आणि काहीजण नुसतेच बाहेरगावच्या नातेवाइकाला भेटायला जायचे आहे, म्हणून ई पास मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

--

म्हणून नाकारला पास

पोलिसांच्या साइटवर ऑनलाईन अर्ज केल्यानंतर २४ तासांत ई पास उपलब्ध करून दिला जातो. अर्ज केल्यानंतर संबंधितांना एक टोकन मिळते. अकोल्यात पोलीस अधीक्षक कार्यालय असून त्या त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पोलीस ठाण्याच्या माध्यमातून किंवा थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातही पाससाठी ऑनलाईन अर्ज करता येते.

अर्जासोबत ज्या गावाला जायचे आहे, ज्यांच्याकडे जायचे आहे, त्यांच्याकडून मागितलेले तेथील डॉक्टरांचे प्रमाणपत्र, अर्जदाराचे फोटो, पत्ता तसेच आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यात ही माहिती जोडल्यानंतर संबंधित व्यक्तीला टोकन दिले जाते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या अर्जाची छाननी केली जाते. यावेळी अनेकजण संयुक्तिक कारण सांगत नसल्याने किंवा आवश्यक कागदपत्रे जोडत नसल्याने ई पास नाकारला जातो.

---