शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधात १ हजार पदांना देणार डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने मनपाची बिंदूनामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके किती कर्मचारी आहेत, ...

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने मनपाची बिंदूनामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके किती कर्मचारी आहेत, याचा ताळमेळ जुळत नसल्यामुळे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्तमान आकृतीबंधानुसार मनपात २ हजार ४०० पदे मंजूर आहेत. काळानुरूप यातील अनेक पदे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे सुधारित आकृतीबंधात सुमारे १ हजार पदांना डच्चू दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत अनेक वर्षांपासून रखडलेल्या बिंदूनामावलीच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याने बिंदूनामावलीअंतर्गत सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, मनपाच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी सुधारित आकृतीबंध तयार करण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडे साेपविण्यात आली. मागील तीन महिन्यांपासून उपायुक्त पंकज जावळे, सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे, सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी दिलीप जाधव या प्रक्रियेला पूर्णविराम देत आहेत.

आयुक्तांनी केले निरीक्षण

मनपाचा आकृतीबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये

आनंदीआनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. आस्थापनेवरील २ हजार २०० कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. याबाबीचे प्रभारी आयुक्त अराेरा यांनी सुक्ष्म निरीक्षण केले.

मनपात सावळा गाेंधळ!

महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलप्रदाय, नगररचना, शिक्षण, कोंडवाडा, अतिक्रमण, अग्निशमन, अर्थ व वित्त विभाग, आरोग्य व स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आदी विभागांमध्ये पात्रता नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाचे पदभार सोपविण्यात आले आहेत. त्यांच्या अधिनस्थ किती कर्मचारी कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याबाबत सावळा गोंधळ आहे. याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

अनावश्यक पदांना सारले बाजुला

राज्य शासनाने ५ लाखांपेक्षा अधिक लाेकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दाेन पदे निर्माण करण्याचे निर्देश जारी केले. परंतु मनपाची वर्तमान आर्थिकस्थिती पाहता व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर हाेणारा माेठा खर्च ध्यानात घेता अतिरिक्त आयुक्तांचे पद निर्माण करण्याची गरज नसल्याची राेखठाेक भूमिका आयुक्त अराेरा यांनी घेतल्याची माहिती आहे.

आकृतीबंधाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाेबतच सेवा प्रवेश नियमावली तयार केली जात आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाईल. यामुळे मनपाची प्रशासकीय गाडी रुळावर येऊन शहर विकासाची प्रलंबित कामे तातडीने निकाली निघण्यास मदत हाेइल, असा आशावाद आहे.

-निमा अराेरा, प्रभारी आयुक्त मनपा