शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधात १ हजार पदांना देणार डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने मनपाची बिंदूनामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके किती कर्मचारी आहेत, ...

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने मनपाची बिंदूनामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके किती कर्मचारी आहेत, याचा ताळमेळ जुळत नसल्यामुळे महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली आहे. वर्तमान आकृतीबंधानुसार मनपात २ हजार ४०० पदे मंजूर आहेत. काळानुरूप यातील अनेक पदे कालबाह्य झाली आहेत. त्यामुळे सुधारित आकृतीबंधात सुमारे १ हजार पदांना डच्चू दिल्या जाणार असल्याची माहिती आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत अनेक वर्षांपासून रखडलेल्या बिंदूनामावलीच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याने बिंदूनामावलीअंतर्गत सरळसेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, मनपाच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी सुधारित आकृतीबंध तयार करण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी उपायुक्त वैभव आवारे यांच्याकडे साेपविण्यात आली. मागील तीन महिन्यांपासून उपायुक्त पंकज जावळे, सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे, सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी दिलीप जाधव या प्रक्रियेला पूर्णविराम देत आहेत.

आयुक्तांनी केले निरीक्षण

मनपाचा आकृतीबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांमध्ये

आनंदीआनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. आस्थापनेवरील २ हजार २०० कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. याबाबीचे प्रभारी आयुक्त अराेरा यांनी सुक्ष्म निरीक्षण केले.

मनपात सावळा गाेंधळ!

महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलप्रदाय, नगररचना, शिक्षण, कोंडवाडा, अतिक्रमण, अग्निशमन, अर्थ व वित्त विभाग, आरोग्य व स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आदी विभागांमध्ये पात्रता नसणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे महत्त्वाचे पदभार सोपविण्यात आले आहेत. त्यांच्या अधिनस्थ किती कर्मचारी कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याबाबत सावळा गोंधळ आहे. याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

अनावश्यक पदांना सारले बाजुला

राज्य शासनाने ५ लाखांपेक्षा अधिक लाेकसंख्या असलेल्या महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दाेन पदे निर्माण करण्याचे निर्देश जारी केले. परंतु मनपाची वर्तमान आर्थिकस्थिती पाहता व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर हाेणारा माेठा खर्च ध्यानात घेता अतिरिक्त आयुक्तांचे पद निर्माण करण्याची गरज नसल्याची राेखठाेक भूमिका आयुक्त अराेरा यांनी घेतल्याची माहिती आहे.

आकृतीबंधाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाेबतच सेवा प्रवेश नियमावली तयार केली जात आहे. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला जाईल. यामुळे मनपाची प्रशासकीय गाडी रुळावर येऊन शहर विकासाची प्रलंबित कामे तातडीने निकाली निघण्यास मदत हाेइल, असा आशावाद आहे.

-निमा अराेरा, प्रभारी आयुक्त मनपा