शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प हमीभावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST

अकोला : बियाणे, खतांच्या किमती वाढत आहे. यामध्ये डिझेल दरवाढीने लागवड खर्चात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन ...

अकोला : बियाणे, खतांच्या किमती वाढत आहे. यामध्ये डिझेल दरवाढीने लागवड खर्चात आणखी भर टाकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. यात पिकांना चांगला दरही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहे. केंद्र शासनाने पिकांच्या आधारभूत किमती जाहीर केल्या. यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद पिकांना अल्पवाढ करण्यात आली आहे. अत्यल्प हमीदर जाहीर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या पेट्रोल, डिझेल तसेच सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नांगरणी करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सर्वच वस्तूंचे भाव वाढले, मात्र शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावात कसलीच वाढ होत नाही. शेतकऱ्यांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे. हमीभावात वाढ न करता केंद्राने पिकांच्या आधारभूत किमतीत किरकोळ वाढ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.

केंद्राने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीत कापसाला २११ रुपये वाढीव भाव दिला आहे. म्हणजे कापसाला ५७२६ रुपये असा भाव मिळणार आहे, तर कापूस लांब धाग्याला ६०२५ रुपये म्हणजे यात केवळ २०० रुपयांची वाढ केली आहे. केवळ शंभर, दोनशे रुपयांनी आधारभूत किंमत वाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

शेतकरी नेते म्हणतात...

सरकारने उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आले आहे; परंतु राज्य शासनाच्या कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या उत्पादन खर्चाएवढी ही रक्कम नाही. सरासरी उत्पादन खर्च काढण्याची पद्धतच वेगळी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च अन्यायकारक असेल, सरकारने बाजारपेठांना अधिक मोकळीक द्यावी, कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेले भाव द्यावे.

- डॉ. नीलेश पाटील, युवा आघाडी विदर्भ प्रमुख, शेतकरी संघटना

सोयाबीनचा उत्पादन खर्च २,२३३ हेक्टरी दाखवला. आता ३,३०० रुपयांची एक बॅग आहे. एका बाजूला बियाणे, खतांचे भाव वाढत असताना उत्पादन खर्च कमी दाखवून शेतमालाच्या किमती काढल्या. हा दुटप्पीपणा असून, ही हमी किंमत नसून मुळातच कमी किंमत आहे.

- मनोज तायडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

सरकारने नेहमीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा सरकारने दिला, असे सांगून जखमेवर मीठ चोळत आहे. शेतकऱ्यांप्रती हे सरकार संवेदनशील नाही व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणही नाही.

- प्रशांत गावंडे, संयोजक, शेतकरी जागर मंच

शेतकरी म्हणतात...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविल्याचे सांगण्यात आले आहे. १००, २०० रुपयांनी दरवाढ करून ही कसही दुप्पट वाढ आहे. शासन याकरिता कोणते निकष लावते हे शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे यात स्पष्टता हवी.

- डॉ. विजय म्हैसने, शेतकरी, कापसी

सरकारने घोषित केल्याप्रमाणे भाव दिले नाही. हरभऱ्यात दोन-तीन वर्षांत ४०० रुपये दरवाढ झाली आहे. माल असल्यास दर मिळत नाही. लागवड खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे हमीदर अत्यल्प आहे.

- संतोष टाले, शेतकरी, माझोड

शासनाने पिकांच्या आधारभूत किमतीत कुठे ३००, तर कुठे ६५ रुपये वाढविले आहे. सद्य:स्थितीत बियाण्यांचे दर वाढले आहे. यामध्ये सोयाबीन बियाण्यांचे दर ३६०० पर्यंत वाढले असून, त्यानुसार हमीदरात वाढ झाली नाही.

- गणेश काळे, शेतकरी, तामशी