शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
2
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
3
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
4
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
7
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
8
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
9
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
10
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
11
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
12
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
13
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
14
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
15
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
16
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
17
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
18
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
19
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
20
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १५,६१८ जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

गतवर्षी एप्रिल महिन्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यावर पाश आवळला असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली दुसरी लाट ...

गतवर्षी एप्रिल महिन्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यावर पाश आवळला असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली दुसरी लाट अनेकांसाठी कर्दनकाळ ठरली. एप्रिल व मे महिन्याच्या पूर्वार्धात कोरोनाने जिल्ह्यात कहरच केला. रुग्णालयांमध्ये खाटाच शिल्लक नसल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. कोरोना संसर्गाची ही साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर, आता हळूहळू कोरोना संसर्गाचा आलेख उतरणीला लागला आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत नव्याने बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या महिनाभरात रुग्णालय व गृहविलगीकरणात असलेल्या तब्बल १५,६१८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायी चित्र दिसून आले आहे.

३६७ जणांचा मृत्यू

मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने मोठ्या संख्येने रुग्ण मृत्यूच्या दाढेत गेले. या महिनाभरात तब्बल ३६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या घटत असली, तरी दररोज होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत.

कडक निर्बंधांचे चांगले परिणाम कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू असलेल्या कडक निर्बंधामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी या निर्बंधांमुळेचे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात यश मिळाले आहे. बाजारपेठांमध्ये दिवसभर होणारी गर्दी नियंत्रणात आल्याने कोरोनाची साखळी खंडित होत आहे.

बेफिकिरी परवडणारी नाही

कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला, तरी मृत्यूसत्र सुरूच आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरीवृत्ती जागृत झाली, तर पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख उंचावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियमांचे पालन केल्यास दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते.