शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

महिनाभरात १५,६१८ जणांनी कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST

गतवर्षी एप्रिल महिन्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यावर पाश आवळला असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली दुसरी लाट ...

गतवर्षी एप्रिल महिन्यात शिरकाव केलेल्या कोरोनाने संपूर्ण जिल्ह्यावर पाश आवळला असून, यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून सुरू झालेली दुसरी लाट अनेकांसाठी कर्दनकाळ ठरली. एप्रिल व मे महिन्याच्या पूर्वार्धात कोरोनाने जिल्ह्यात कहरच केला. रुग्णालयांमध्ये खाटाच शिल्लक नसल्याने संपूर्ण आरोग्य यंत्रणा हतबल झाली होती. कोरोना संसर्गाची ही साखळी खंडित करण्यासाठी ब्रेक द चेनअंतर्गत कठोर निर्बंध लादण्यात आल्यानंतर, आता हळूहळू कोरोना संसर्गाचा आलेख उतरणीला लागला आहे. १ मे ते ३१ मे या कालावधीत नव्याने बाधित होणाऱ्यांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. या महिनाभरात रुग्णालय व गृहविलगीकरणात असलेल्या तब्बल १५,६१८ जणांनी कोरोनावर मात केल्याचे आशादायी चित्र दिसून आले आहे.

३६७ जणांचा मृत्यू

मे महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातल्याने मोठ्या संख्येने रुग्ण मृत्यूच्या दाढेत गेले. या महिनाभरात तब्बल ३६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या घटत असली, तरी दररोज होणारे मृत्यू चिंता वाढविणारे आहेत.

कडक निर्बंधांचे चांगले परिणाम कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी लागू असलेल्या कडक निर्बंधामुळे नागरिकांची गैरसोय झाली असली, तरी या निर्बंधांमुळेचे कोरोना संसर्गाचा वेग कमी करण्यात यश मिळाले आहे. बाजारपेठांमध्ये दिवसभर होणारी गर्दी नियंत्रणात आल्याने कोरोनाची साखळी खंडित होत आहे.

बेफिकिरी परवडणारी नाही

कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला, तरी मृत्यूसत्र सुरूच आहे. रुग्णसंख्या घटत असल्याने नागरिकांमध्ये बेफिकिरीवृत्ती जागृत झाली, तर पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख उंचावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना नियमांचे पालन केल्यास दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकते.