शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पावसाळ्यातही पारा ३६ च्या वर

By admin | Updated: August 11, 2014 22:54 IST

रपावसाअभावी सारेच चिंतातुर : शेतकर्‍यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे

खामगाव : पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात परंतु जोराच्या वाहत्या वार्‍यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातुर झाले आहेत. चालु आठवड्यात तापमानाचा पारा वाढला असून काल रविवारी कमाल तापमान ३६.0४ अंश से. एवढे होते. खरिप हंगामातील पेरण्या जून महिन्यात होतील या आशेने शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी केली होती. मृग नक्षत्रातील पाऊस पडताच शेतकरी पेरणीस लागतात. मात्र यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या तब्बल दिड महिना उशीरा झाल्या. अर्धा जुलै महिना होईपर्यंंत पाऊस आलाच नाही. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीकरिता लागणारी बी-बीयाणे साठी शेतकर्‍यांनी बॅकाचे तसेच खाजगी कर्ज काढले आहे. मात्र पेरणी झाली व रिमझीम पावसामुळे पिके निघुन आली. दमदार पाऊस येईलच या आशेने शेतकरी पावासाची वाट पाहत आहे. निघुन आलेली कोवळी पिके हवेत डोलत असली तर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकर्‍यांसमोर उभे राहिले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त नाही तर सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर होणार असल्याचा अंदाच येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील अनेक भागामध्ये ढग दाटुन येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वार्‍यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. पाऊस आल्यास हवेत आर्द्रता निर्माण होवून उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३४ अंशावरून ३६ अंशापर्यंंंत जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते.

** कोरड्या दुष्काळाची भीती

पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थीती गभीर होत चालली आहे. गेल्या सहा दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने उगवलेली रोपे कोमजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही तर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यासह सामान्य नागरिकांनाही पावसाची प्रतिक्षा असुन दुष्काळ पडण्याची अनेकांना भीती वाटत आहे.