शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही पारा ३६ च्या वर

By admin | Updated: August 11, 2014 22:54 IST

रपावसाअभावी सारेच चिंतातुर : शेतकर्‍यांच्या नजरा पुन्हा आकाशाकडे

खामगाव : पावसाळा सुरू झाला, मात्र पाऊस नाही. ढग दाटून येतात परंतु जोराच्या वाहत्या वार्‍यामुळे वातावरण पुन्हा सामान्य होते. पाऊस पडत नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकही पाणी नसल्यामुळे चिंतातुर झाले आहेत. चालु आठवड्यात तापमानाचा पारा वाढला असून काल रविवारी कमाल तापमान ३६.0४ अंश से. एवढे होते. खरिप हंगामातील पेरण्या जून महिन्यात होतील या आशेने शेतकर्‍यांनी पेरणीची तयारी केली होती. मृग नक्षत्रातील पाऊस पडताच शेतकरी पेरणीस लागतात. मात्र यावर्षी वरुण राजाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या तब्बल दिड महिना उशीरा झाल्या. अर्धा जुलै महिना होईपर्यंंत पाऊस आलाच नाही. २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीकरिता लागणारी बी-बीयाणे साठी शेतकर्‍यांनी बॅकाचे तसेच खाजगी कर्ज काढले आहे. मात्र पेरणी झाली व रिमझीम पावसामुळे पिके निघुन आली. दमदार पाऊस येईलच या आशेने शेतकरी पावासाची वाट पाहत आहे. निघुन आलेली कोवळी पिके हवेत डोलत असली तर पुन्हा पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली रोपे वाचविण्याचे जणू आव्हानच शेतकर्‍यांसमोर उभे राहिले. पाऊस नसल्यामुळे केवळ शेतकरीच त्रस्त नाही तर सामान्य नागरिकही चिंतातूर झालेला आहे. दिवसेंदिवस पाणी समस्या बिकट बनत चालली आहे. त्याचा परिणाम आर्थिक बाबीवर होणार असल्याचा अंदाच येत असल्यामुळे अनेकजण चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील अनेक भागामध्ये ढग दाटुन येत आहेत. मात्र वेगाने वाहत असलेल्या वार्‍यामुळे आलेले ढग निघून जात आहेत. वातावरण पुन्हा कोरडेठाक होते. ढग नसल्याने तापमानात वाढ होत चालली आहे. पाऊस आल्यास हवेत आर्द्रता निर्माण होवून उन्हाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. गेल्या दहा दिवसांत तापमान वाढत चालले आहे. गेल्या तीन दिवसांत तापमान ३४ अंशावरून ३६ अंशापर्यंंंत जाऊन पोहचले आहे. यावरुन तापमान वाढत असल्याचे लक्षात येते.

** कोरड्या दुष्काळाची भीती

पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांची परिस्थीती गभीर होत चालली आहे. गेल्या सहा दिवसांत तापमानात वाढ होत असल्याने उगवलेली रोपे कोमजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही तर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकर्‍यासह सामान्य नागरिकांनाही पावसाची प्रतिक्षा असुन दुष्काळ पडण्याची अनेकांना भीती वाटत आहे.