शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दनोरी येथील तरुणाची निर्घृण हत्या

By admin | Updated: November 9, 2014 00:40 IST

अकोट तालुक्यातील घटना, सात आरोपींना अटक आणि पोलिस कोठडीत रवानगी.

चोहोट्टा बाजार (अकोला) : आकोट तालुक्यातील दनोरी येथील एका तरुणास त्याच गावातील काही जणांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मिनी ट्रकने चिरडून त्याची हत्या केल्याची घटना ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी ७ आरोपींना अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दहीहांडा पोलिस स्टेशनांतर्गत दनोरी येथे ७ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जुन्या वादावरून ३८ वर्षीय संदीप शालीग्राम पाखरे याला आरोपींनी सगनमत करून कुर्‍हाड, काठी, पाइपने मारहाण केली. यामध्ये तो जिवंत राहू नये म्हणून ४0७ मिनी ट्रकखाली चिरडून टाकण्यात आले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मृतकाचा भाऊ देवानंद शालीग्राम पाखरे याने दहीहांडा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रेमदास रामराव पाखरे, तिरंदास रामराव पाखरे, अशोक रामराव पाखरे, हिरालाल नाजुकराव पाखरे, नाजुकराव सारंगधर पाखरे, मुरलीधर सारंगधर पाखरे, सिद्धार्थ नागोराव धांडे सर्व रा. दनोरी यांचे विरुद्ध भादंवि कलम ३0२, १४७, १४८, १४९ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांचे मार्गदर्शनात दहीहांडा ठाणेदार ताराचंद किल्लेवाले व कर्मचारी पांडुरंग राऊत, संजय घायल, अशोकसिंग ठाकूर, केशव धोटे, मंगेश महाजन, प्रवीण ठाकरे, सुभाष थोरात यांनी आरोपींना रात्रीच अटक केली. आरोपींना ८ नोव्हेंबर रोजी आकोट येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.