शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
2
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
3
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
4
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
5
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
6
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
7
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
8
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
9
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
10
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
11
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
12
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
13
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
14
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
15
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
16
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
17
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
18
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
19
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
20
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

सलग तिस-या वर्षी दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 6, 2015 01:41 IST

४५ टक्के पेरण्या बाकी; ५५ टक्के उलटण्याची शक्यता.

विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. दोन वर्षांपूर्वी अतवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील शेती व्यवसायाची दयनीय अवस्था झाली असून, गत दोन वर्षांनंतरही पुन्हा या वर्षी दुष्काळाचे सावट दिसत आहे. गतवर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाला होता. त्यानंतरही नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ घोषित झाला होता. तसेच आणेवारीही ४१ पैसे होती. त्यानंतर यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, तरी त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुन्हा पिकांचे नुकसान होणार असून, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पिके कोमेजली असून, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकर्‍यांची पेरणी उलटणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टरपैकी २ लाख ६५ हजार २९९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ही पेरणी सरासरीच्या ५५ टक्के, तर नियोजित लक्ष्याच्या ५८ टक्के आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून तर १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस झाला. तसेच पावसाळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी लगबगीने पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी दिली असून, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. तसेच तापमानातही वाढ झाली. त्यामुळे पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या पिके सुकायला सुरुवात झाली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १५ जूननंतर पावसाने दांडी दिल्यामुळे जिल्ह्यात २ लाख १८ हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली नाही. तसेच आगामी काही दिवस पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे हे क्षेत्र आणखी आठ दिवस रिकामेच राहणार आहे. उशिरा पेरणी केली तर पिकांचे नुकसान होते. आवश्यक प्रमाणात उत्पादन होत नसून, त्यामध्ये घट येते. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.

*पीक पद्धतीच बदलणार; २ लाख हेक्टर क्षेत्र रिकामेच

   जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ४५ टक्के म्हणजे २ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही. जिल्ह्यात कडक उन्ह तापत असून, आणखी आठ ते दहा दिवस पावसाचा अंदाज नाही. मूग व उडिदाची पेरणी जून महिन्यातच करणे गरजेचे असते. त्यानंतर पेरणी केली तर उत्पादनात घट येते. त्यामुळे आगामी आठ दिवसांत पाऊस आला तरीही शेतकर्‍यांना सोयाबीन व तुरीची पेरणी करावी लागणार आहे. परिणामी जिल्ह्यातील पीक पद्धती बदलणार आहे. गतवर्षी मूग व उडिदाची पेरणी अल्प प्रमाणात झाली होती, यावर्षी तीच परिस्थिती ओढवणार आहे.