शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

सलग तिस-या वर्षी दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 6, 2015 01:41 IST

४५ टक्के पेरण्या बाकी; ५५ टक्के उलटण्याची शक्यता.

विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. दोन वर्षांपूर्वी अतवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील शेती व्यवसायाची दयनीय अवस्था झाली असून, गत दोन वर्षांनंतरही पुन्हा या वर्षी दुष्काळाचे सावट दिसत आहे. गतवर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाला होता. त्यानंतरही नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ घोषित झाला होता. तसेच आणेवारीही ४१ पैसे होती. त्यानंतर यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, तरी त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुन्हा पिकांचे नुकसान होणार असून, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पिके कोमेजली असून, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकर्‍यांची पेरणी उलटणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टरपैकी २ लाख ६५ हजार २९९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ही पेरणी सरासरीच्या ५५ टक्के, तर नियोजित लक्ष्याच्या ५८ टक्के आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून तर १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस झाला. तसेच पावसाळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी लगबगीने पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी दिली असून, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. तसेच तापमानातही वाढ झाली. त्यामुळे पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या पिके सुकायला सुरुवात झाली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १५ जूननंतर पावसाने दांडी दिल्यामुळे जिल्ह्यात २ लाख १८ हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली नाही. तसेच आगामी काही दिवस पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे हे क्षेत्र आणखी आठ दिवस रिकामेच राहणार आहे. उशिरा पेरणी केली तर पिकांचे नुकसान होते. आवश्यक प्रमाणात उत्पादन होत नसून, त्यामध्ये घट येते. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.

*पीक पद्धतीच बदलणार; २ लाख हेक्टर क्षेत्र रिकामेच

   जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ४५ टक्के म्हणजे २ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही. जिल्ह्यात कडक उन्ह तापत असून, आणखी आठ ते दहा दिवस पावसाचा अंदाज नाही. मूग व उडिदाची पेरणी जून महिन्यातच करणे गरजेचे असते. त्यानंतर पेरणी केली तर उत्पादनात घट येते. त्यामुळे आगामी आठ दिवसांत पाऊस आला तरीही शेतकर्‍यांना सोयाबीन व तुरीची पेरणी करावी लागणार आहे. परिणामी जिल्ह्यातील पीक पद्धती बदलणार आहे. गतवर्षी मूग व उडिदाची पेरणी अल्प प्रमाणात झाली होती, यावर्षी तीच परिस्थिती ओढवणार आहे.