शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

सलग तिस-या वर्षी दुष्काळाचे सावट

By admin | Updated: July 6, 2015 01:41 IST

४५ टक्के पेरण्या बाकी; ५५ टक्के उलटण्याची शक्यता.

विवेक चांदूरकर / अकोला : जिल्ह्यात गत दोन वर्षांपासून दुष्काळ आहे. दोन वर्षांपूर्वी अतवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यातील शेती व्यवसायाची दयनीय अवस्था झाली असून, गत दोन वर्षांनंतरही पुन्हा या वर्षी दुष्काळाचे सावट दिसत आहे. गतवर्षी पाऊस तब्बल दोन महिने उशिरा झाला होता. त्यानंतरही नियमित पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. जिल्ह्यात दुष्काळ घोषित झाला होता. तसेच आणेवारीही ४१ पैसे होती. त्यानंतर यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस झाला, तरी त्यानंतर पावसाने दडी दिल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पुन्हा पिकांचे नुकसान होणार असून, दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होणार आहे. गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पिके कोमेजली असून, शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आगामी तीन ते चार दिवसांत पाऊस झाला नाही तर शेतकर्‍यांची पेरणी उलटणार असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ८८0 हेक्टरपैकी २ लाख ६५ हजार २९९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. ही पेरणी सरासरीच्या ५५ टक्के, तर नियोजित लक्ष्याच्या ५८ टक्के आहे. जिल्ह्यात ७ जूनपासून तर १५ जूनपर्यंत जोरदार पाऊस झाला. तसेच पावसाळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी लगबगीने पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने दांडी दिली असून, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. तसेच तापमानातही वाढ झाली. त्यामुळे पिकांना पावसाची नितांत गरज आहे. सध्या पिके सुकायला सुरुवात झाली आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. १५ जूननंतर पावसाने दांडी दिल्यामुळे जिल्ह्यात २ लाख १८ हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली नाही. तसेच आगामी काही दिवस पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे हे क्षेत्र आणखी आठ दिवस रिकामेच राहणार आहे. उशिरा पेरणी केली तर पिकांचे नुकसान होते. आवश्यक प्रमाणात उत्पादन होत नसून, त्यामध्ये घट येते. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, शेतकरी चिंतातूर झाला आहे.

*पीक पद्धतीच बदलणार; २ लाख हेक्टर क्षेत्र रिकामेच

   जिल्ह्यात ३ जुलैपर्यंत ४५ टक्के म्हणजे २ लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही. जिल्ह्यात कडक उन्ह तापत असून, आणखी आठ ते दहा दिवस पावसाचा अंदाज नाही. मूग व उडिदाची पेरणी जून महिन्यातच करणे गरजेचे असते. त्यानंतर पेरणी केली तर उत्पादनात घट येते. त्यामुळे आगामी आठ दिवसांत पाऊस आला तरीही शेतकर्‍यांना सोयाबीन व तुरीची पेरणी करावी लागणार आहे. परिणामी जिल्ह्यातील पीक पद्धती बदलणार आहे. गतवर्षी मूग व उडिदाची पेरणी अल्प प्रमाणात झाली होती, यावर्षी तीच परिस्थिती ओढवणार आहे.