शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट !

By admin | Updated: June 25, 2017 13:48 IST

वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे.

शेतकरी हवालदिल ; बियाणे बाजारातील गर्दी ओसरलीअकोला : वर्‍हाडात पावसाने दडी मारल्याने पेरण्या उलटण्याचे प्रमाण वाढले आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या अनिच्छिततेचा परिणाम बियाणे बाजारावर झाली असून, शेतकर्‍यांनी अद्याप पुर्ण शंभर टक्के कृषी निविष्ठाची खरेदी केलेली नाही.अमरावती,अकोला,बुलडाणा व वाशिम जिल्हयात जवळपास ५0 ते ५५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अकोला जिल्हयात १0 टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यावर्षी चांगल्या पावसाचे भाकीत केल्याने पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी या आशेवर पहिल्याच पावसात जवळपास ५0 टक्के क्षेत्रावर पेरणी केली आहे; पण पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली पिके कोमेजू लागली आहेत. पाण्याची थोडीफार उपलब्धता असलेल्या ठिकाणी तुषार सिंचनाद्वारे पिके जगविण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून केला जात आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास पिके उलटण्याची भीती असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.दरम्यान, पश्‍चिम विदर्भातील पाच जिल्हय़ांत ३२ लाखांवर क्षेत्र खरीप हंगामाचे आहे. यातील अध्र्याच्यावर म्हणजेच १७ लाख हेक्टर क्षेत्र हे अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात आहे. अकोला वगळता बुलडाणा व वाशिम जिल्हय़ात ५0 टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे; पण पावसाने दडी मारल्याने अंकुरलेली पिके करपू लागली असून, उर्वरित पेरण्यांना विलंब होत आहे. पिकांना तातडीने पावसाची गरज असल्याने शेतकर्‍यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १३ हजार हेक्टरवर कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केले आहे. त्यातील २ लाख ५0 हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. हे क्षेत्र ५१ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील ७ लाख ४७ हजार ५७८ हेक्टर क्षेत्र खरीप हंगामातील पेरणीचे असून,जवळपास ४ लाख हजार हेक्टरवर शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. घाटाखालील परिस्थिती नाजूक आहे.पाऊस न आल्यास घाटाखाली आणि घाटावरील पिके उलटण्याची शक्यता आहे. अक ोला जिल्हय़ातही ४ लाख ८६ हजार ६00 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत यातील १0 टक्क्यांच्यावर पेरणी आटोपली आहे. यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातही ५0 टक्क्यांच्या जवळपास पेरण्या आटोपल्या आहेत.

- पाऊस लाबंला आणि तापमानात वाढ झाल्याने पेरणी केलेली वर्‍हाडातील पिके कोमेजू लागली आहेत. बुलडणा जिल्हयातही हीच परिस्थिती आहे.घाटाखालची परिस्थिती नाजूक आहे. घाटावरही आता पाऊस हवा आहे. एक दोन दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची शक्यता नाकारता येत नाही. - प्रमोद लहाळे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,बुलडाणा.