शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने सोयबीन, धानाचे उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:48 IST

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देपाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे.

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मुरमाड जमिनीतील पिके आताच कोमेजली असून, सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे. विदर्भातील १५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीन, धान पिकांना येत्या आठवड्यात पाणी न मिळाल्यास ही पिके हातची जाण्याचा धोका आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली आहे. एवढ्यात पाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली असून, बहुतांश भागात हे पीक करपले आहे. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील कापूस पीकही करपले आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. सध्या भारी, काळ्या जमिनीतील कापूस पीक तग धरू न आहे. या जमिनीतील तूर पीकही उत्तम आहे; पण पावसाची आता नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास या पिकांनाही धोका होण्याची शक्यता आहे. पाऊस नंतर दीर्घ खंड पडल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अगोदरच कपाशीवरील बोंडअळीचे व्यवस्थापन करताना शेतकरी गलितगात्र झाला असताना सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे. अमरावती १९, नागपूर ११, भंडारा १३, वर्धा १३, यवतमाळ ९, गोंदिया ७, तर वाशिम जिल्ह्यात ५ टक्के पाऊस कमी आहे.

विदर्भात पावसाने दडी मारल्याने बरड जमिनीतील पिके कोमेजली आहेत. एवढ्यात पाऊस न आल्यास ही पिके हातची जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील धान व पश्चिम विदर्भातील सोयाबीन पीक सध्या अडचणीत आहे.डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ