शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पावसाने दडी मारल्याने सोयबीन, धानाचे उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:48 IST

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देपाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे.

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मुरमाड जमिनीतील पिके आताच कोमेजली असून, सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे. विदर्भातील १५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीन, धान पिकांना येत्या आठवड्यात पाणी न मिळाल्यास ही पिके हातची जाण्याचा धोका आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली आहे. एवढ्यात पाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली असून, बहुतांश भागात हे पीक करपले आहे. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील कापूस पीकही करपले आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. सध्या भारी, काळ्या जमिनीतील कापूस पीक तग धरू न आहे. या जमिनीतील तूर पीकही उत्तम आहे; पण पावसाची आता नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास या पिकांनाही धोका होण्याची शक्यता आहे. पाऊस नंतर दीर्घ खंड पडल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अगोदरच कपाशीवरील बोंडअळीचे व्यवस्थापन करताना शेतकरी गलितगात्र झाला असताना सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे. अमरावती १९, नागपूर ११, भंडारा १३, वर्धा १३, यवतमाळ ९, गोंदिया ७, तर वाशिम जिल्ह्यात ५ टक्के पाऊस कमी आहे.

विदर्भात पावसाने दडी मारल्याने बरड जमिनीतील पिके कोमेजली आहेत. एवढ्यात पाऊस न आल्यास ही पिके हातची जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील धान व पश्चिम विदर्भातील सोयाबीन पीक सध्या अडचणीत आहे.डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ