शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने सोयबीन, धानाचे उत्पादन घटणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 14:48 IST

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देपाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे.

अकोला : यावर्षी सुरुवातीला पाऊस चांगला झाला; पण अचानक दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन, धान पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मुरमाड जमिनीतील पिके आताच कोमेजली असून, सर्वच खरीप पिकांवर दुष्परिणाम होत आहे. विदर्भातील १५ लाख हेक्टरच्यावर सोयाबीन, धान पिकांना येत्या आठवड्यात पाणी न मिळाल्यास ही पिके हातची जाण्याचा धोका आहे.विदर्भातील अमरावती विभागात यावर्षी ९० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत; पण नागपूर विभाग पीछाडीवर आहे. या विभागात ७१ टक्केच पेरण्या झाल्या होत्या. या विभागात सर्वात जास्त सहा लाखांवर धानाचे क्षेत्र आहे; पण पावसाने दीर्घ दडी मारल्याने भाताची (धान) चिखलणी व रोवणी रखडली आहे. एवढ्यात पाऊस न आल्यास धानाचे २५ ते ३० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता आताच वर्तविण्यात येत आहे. अमरावती विभागात सोयाबीनची पेरणी सर्वाधिक १४ लाख हेक्टरवर झाली आहे; पण पावसाने दडी मारल्याने मुरमाड जमिनीतील सोयाबीन पिकाने मान टाकली असून, बहुतांश भागात हे पीक करपले आहे. पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील कापूस पीकही करपले आहे. अनेक शेतकऱ्यांना कापसावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. सध्या भारी, काळ्या जमिनीतील कापूस पीक तग धरू न आहे. या जमिनीतील तूर पीकही उत्तम आहे; पण पावसाची आता नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास या पिकांनाही धोका होण्याची शक्यता आहे. पाऊस नंतर दीर्घ खंड पडल्याने किडींना पोषक वातावरण तयार झाले आहे. अगोदरच कपाशीवरील बोंडअळीचे व्यवस्थापन करताना शेतकरी गलितगात्र झाला असताना सोयाबीनवर स्पोडोप्टेरा, चक्रीभुंगा, हिरवी उंटअळी आदी किडींचा उद्रेक वाढला आहे.विदर्भात सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस असून, बुलडाणा जिल्ह्यात ३७ टक्के पाऊस कमी आहे. अमरावती १९, नागपूर ११, भंडारा १३, वर्धा १३, यवतमाळ ९, गोंदिया ७, तर वाशिम जिल्ह्यात ५ टक्के पाऊस कमी आहे.

विदर्भात पावसाने दडी मारल्याने बरड जमिनीतील पिके कोमेजली आहेत. एवढ्यात पाऊस न आल्यास ही पिके हातची जाण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील धान व पश्चिम विदर्भातील सोयाबीन पीक सध्या अडचणीत आहे.डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ