शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाअभावी वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत पेरण्या खोळंबल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:13 IST

अकोला : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. अमरावती विभागातील पाच ...

अकोला : पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत ४१.६ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अद्यापही सर्वदूर पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा विदर्भात मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. दमदार पाऊस बरसणार व पिकेही चांगली होणार असल्याची प्रत्येकाला अपेक्षा होती, परंतु सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे. वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांमध्ये ४१.६ टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, जून महिना संपत आला आहे, तरी पेरणी योग्य पाऊस न झाल्यामुळे तीन जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहे. यामध्ये अकोला केवळ १०.५, बुलडाणा ३१.२ व अमरावती जिल्ह्यात २४.७ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहे. शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या जागृतीच्या परिणामीही सोयाबीन लागवड झाली नाही.

कपाशीचा पेरा ५० टक्के

वऱ्हाडातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीची पेरणी ५१.२ टक्के क्षेत्रात आटोपली आहे, परंतु यावेळी पावसाने हुलकावणी दिल्याने अद्याप अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांच्या आत पेरणी झाली आहे. यवतमाळ जिल्ह्याने कपाशी लागवडीत आघाडी घेतली आहे.

अमरावती विभागातील पेरणी

सरासरी क्षेत्र

३२,२८,५८१ हेक्टर

पेरणी क्षेत्र

१३,४३,५८० हेक्टर

वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पेरणी

पावसाअभावी अमरावती विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पेरण्या रखडल्या आहेत, परंतु वाशिम व यवतमाळ जिल्ह्यामध्ये बहुतांश क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यामध्ये वाशिम ७८.५ तर यवतमाळ जिल्ह्यात ६२.७ टक्के क्षेत्रात पेरणी झाली.

जमिनीत ओलावा नसल्याने बियाणे खराब होण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी पावसाचा थेंबही पडत नाही. येथील जमिनीत आवश्यक प्रमाणात ओलावा नसल्याने पेरणी केलेले सोयाबीन, कापूस व तुरीचे बियाणे खराब होण्याची शक्यता आहे.

यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर पेरणी केली, परंतु अपेक्षित पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे पिके कोमेजत आहेत.

- संतोष टाले, शेतकरी, माझोड

मृग नक्षत्राने केली निराशा; ‘आद्रा’कडून आशा

मृग नक्षत्रामध्ये दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. पिकेही कोमेजून जात आहेत. मात्र, २२ जूनपासून आद्रा नक्षत्र सुरू झाले असून, या नक्षत्रात तरी पाऊस बरसणार, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.