शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

देखभाल-दुरुस्तीअभावी पाणीटंचाईत भर

By admin | Updated: December 5, 2014 01:32 IST

प्रादेशिक, स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा विस्कळीत.

संतोष येलकर /अकोलापाणीपुरवठा करण्याइतपत जलसाठा उपलब्ध असला तरी देखभाल-दुरुस्ती कामांच्या अभावात जिल्ह्यातील प्रादेशिक आणि स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असल्याने, पाणीटंचाईच्या परिस्थितीत आणखीच भर पडली आहे.जिल्ह्यात सध्या सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत २३0 गावांना पाणी पुरवले जाते. त्यामध्ये ८४ खेडी व लंघापूर या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत, तर खांबोरा, गोपालखेड,कारंजा रमजानपूर,लोहारा व वझेगाव या पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजनेशी संलग्न आहेत. ४९४ गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांमार्फत पाणी दिले जात आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध झाला नाही. अत्यल्प जलसाठा उपलब्ध असल्याच्या स्थितीत जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असला तरी पाणीपुरवठा करण्याएवढा जलसाठा सध्या उपलब्ध आहे; मात्र जलवाहिन्यांची तुटफूट, जलवाहिन्यांना गळती, वीज देयकाचा विलंबाने होणारा भरणा, विजेचा कमी-जास्त दाब, लोखंडी जलवाहिन्यांऐवजी पीव्हीसी जलवाहिन्याचा वापर, नादुरुस्त विद्युत पंप व इतर प्रकारच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांचा अभाव असल्याने, जिल्ह्यातील सात प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि ४९८ स्वतंत्र पाणीपुरवठय्योजनांतर्गत गावांचा पाणीपुरवठा अनेकदा विस्कळीत होतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या परिस्थितीत आणखीच भर पडत असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत आहे.