शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

आयातीने बिघडले तुरीचे ‘अर्थशास्त्र’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 13:36 IST

अकोला : मागील दोन वर्षांत राज्यात तूर पिकाचे बम्पर उत्पादन झाले; पण सरकारने तूर आयात केलेली असून, यावर्षीही दोन लाख क्विंटल तूर आयात केली जाणार आहे.

ठळक मुद्दे२०१४-१५ मध्ये राज्यातील १२ लाख १० हजार २० हेक्टरवर तूर पिकाची पेरणी होऊनही उत्पादन मात्र ३ लाख ५३ हजार ३० टन झाले. तूर डाळीचे दर वाढल्याने डाळीची गरज भागविण्यासाठी शासनाने तूर डाळ आयात केली.शासनाने आयातीचा करार केला असल्याने आता तोे मोडता येत नाही. पाच वर्षांचा तो करार केला असेल, तोपर्यंत तूर आयात करावीच लागणार आहे.

- राजरत्न सिरसाट,अकोला : मागील दोन वर्षांत राज्यात तूर पिकाचे बम्पर उत्पादन झाले; पण सरकारने तूर आयात केलेली असून, यावर्षीही दोन लाख क्विंटल तूर आयात केली जाणार आहे. याचा परिणाम बाजार दरावर झाल्याने यावर तोडगा म्हणून शासनाने बऱ्यापैकी हमीदर जाहीर करू न शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केली; परंतु या खरेदी केंद्रावर तूर खरेदीची व्यवस्थाच केली नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी दरात बाजारात तूर विकावी लागत आहे. शासनाच्या तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आजही लाखो क्ंिवटल तूर खरेदीविना पडून असल्याने शेतकºयांचे ‘अर्थशास्त्र’ बिघडले आहे.देशात तूर पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र महाराष्टÑात असून, उत्पादनातही प्रथम क्रमांकावर आहे; पण पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम झाल्याने २०१४-१५ मध्ये राज्यातील १२ लाख १० हजार २० हेक्टरवर तूर पिकाची पेरणी होऊनही उत्पादन मात्र ३ लाख ५३ हजार ३० टन झाले. २०१५-१६ मध्येही हीच परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणी १२ लाख ३६ हजार ७० हेक्टरवर होऊनही उत्पादन ३ लाख ५ हजार ६० टन एवढेच झाले. या दोन वर्षांत उत्पादनात प्रचंड घट आल्याने तूर डाळीचे दर प्रतिकिलो २०० रुपयांवर गेले. तूर डाळीचे दर वाढल्याने डाळीची गरज भागविण्यासाठी शासनाने तूर डाळ आयात केली. तूर डाळ आयात करताच डाळीचे दर प्रतिक्ंिवटल ४ ते ५ हजार रुपयांनी घटले. यावर उपाय म्हणून आंतरराष्टÑीय कडधान्य वर्षाच्या निमित्ताने शासनाने कडधान्य लागवडीवर भर दिला. कृषी विभागाने राज्यात जनजागृती केल्याने राज्यातील तूर पिकाचे क्षेत्र २०१६-१७ मध्ये १२ लाखांहून १४ लाख ३५ हजार ६० हेक्टरपर्यंत पोहोचले. उत्पादनही २० लाख ८९ हजार २०० टनापर्यंत वाढले. मागील दहा वर्षांतील तुरीचे हे बम्पर उत्पादन होते. २०१७-१८ मध्ये राज्यात १२ लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. उत्पादन ११ लाख ७० टन एवढे झाले; पण भारत सरकारने तूर डाळ खरेदीसाठीचा करार आफ्रिकन देशातील मोझँकिक व इतर देशांसोबत केलेला असल्याने तूर डाळ देशात आयात करण्यात येत आहे. आयातीत तूर डाळीचे दर हे ४,५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. यावर तोडगा म्हणून केंद्र शासनाने प्रतिक्ंिवटल ५,२५० रुपये हमीदर जाहीर केले. यावर प्रतिक्ंिवटल २०० रुपये बोनसही जाहीर करू न नाफेडमाार्फत शासकीय तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकºयांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करू न आॅनलाइन नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला एकरी दोन क्ंिवटल तूर खेरदीची मर्यादा टाकण्यात आली, नंतर शेतकºयांची नाराजी वाढताच ही मर्यादा एकरी चार व हेक्टरी १० क्ंिवटलपर्यंत वाढविण्यात आली.

 राज्यात तुरीचे उत्पादन वाढले आहे; पण दर कोसळले. शासनाने आयातीचा करार केला असल्याने आता तोे मोडता येत नाही. पाच वर्षांचा तो करार केला असेल, तोपर्यंत तूर आयात करावीच लागणार आहे. तसेच शासनाच्या तूर खरेदीची व्यवस्था दुरुस्त करणे क्रमप्राप्त आहे. तुरीचे मूल्यवर्धन करणे त्याहीपेक्षा गरजेचे आहे. तुरीला कीड लागण्यापूर्वी वेळापत्रक ठरवून तूर खरेदी करू न तुरीची डाळ करण्यासाठी डाळ गिरण्याकडे पाठविण्याची गरज आहे.डॉ. के.बा.वंजारी,इमेरिट्स सायन्टिस्ट (आयसीएआर, दिल्ली) तथा माजी विभाग प्रमुख,कडधान्य संशोधन विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी