शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आयातीने बिघडले तुरीचे ‘अर्थशास्त्र’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 13:36 IST

अकोला : मागील दोन वर्षांत राज्यात तूर पिकाचे बम्पर उत्पादन झाले; पण सरकारने तूर आयात केलेली असून, यावर्षीही दोन लाख क्विंटल तूर आयात केली जाणार आहे.

ठळक मुद्दे२०१४-१५ मध्ये राज्यातील १२ लाख १० हजार २० हेक्टरवर तूर पिकाची पेरणी होऊनही उत्पादन मात्र ३ लाख ५३ हजार ३० टन झाले. तूर डाळीचे दर वाढल्याने डाळीची गरज भागविण्यासाठी शासनाने तूर डाळ आयात केली.शासनाने आयातीचा करार केला असल्याने आता तोे मोडता येत नाही. पाच वर्षांचा तो करार केला असेल, तोपर्यंत तूर आयात करावीच लागणार आहे.

- राजरत्न सिरसाट,अकोला : मागील दोन वर्षांत राज्यात तूर पिकाचे बम्पर उत्पादन झाले; पण सरकारने तूर आयात केलेली असून, यावर्षीही दोन लाख क्विंटल तूर आयात केली जाणार आहे. याचा परिणाम बाजार दरावर झाल्याने यावर तोडगा म्हणून शासनाने बऱ्यापैकी हमीदर जाहीर करू न शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू केली; परंतु या खरेदी केंद्रावर तूर खरेदीची व्यवस्थाच केली नसल्याने शेतकºयांना अत्यंत कमी दरात बाजारात तूर विकावी लागत आहे. शासनाच्या तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आजही लाखो क्ंिवटल तूर खरेदीविना पडून असल्याने शेतकºयांचे ‘अर्थशास्त्र’ बिघडले आहे.देशात तूर पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र महाराष्टÑात असून, उत्पादनातही प्रथम क्रमांकावर आहे; पण पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम झाल्याने २०१४-१५ मध्ये राज्यातील १२ लाख १० हजार २० हेक्टरवर तूर पिकाची पेरणी होऊनही उत्पादन मात्र ३ लाख ५३ हजार ३० टन झाले. २०१५-१६ मध्येही हीच परिस्थिती निर्माण झाल्याने पेरणी १२ लाख ३६ हजार ७० हेक्टरवर होऊनही उत्पादन ३ लाख ५ हजार ६० टन एवढेच झाले. या दोन वर्षांत उत्पादनात प्रचंड घट आल्याने तूर डाळीचे दर प्रतिकिलो २०० रुपयांवर गेले. तूर डाळीचे दर वाढल्याने डाळीची गरज भागविण्यासाठी शासनाने तूर डाळ आयात केली. तूर डाळ आयात करताच डाळीचे दर प्रतिक्ंिवटल ४ ते ५ हजार रुपयांनी घटले. यावर उपाय म्हणून आंतरराष्टÑीय कडधान्य वर्षाच्या निमित्ताने शासनाने कडधान्य लागवडीवर भर दिला. कृषी विभागाने राज्यात जनजागृती केल्याने राज्यातील तूर पिकाचे क्षेत्र २०१६-१७ मध्ये १२ लाखांहून १४ लाख ३५ हजार ६० हेक्टरपर्यंत पोहोचले. उत्पादनही २० लाख ८९ हजार २०० टनापर्यंत वाढले. मागील दहा वर्षांतील तुरीचे हे बम्पर उत्पादन होते. २०१७-१८ मध्ये राज्यात १२ लाख २८ हजार हेक्टरवर पेरणी झाली. उत्पादन ११ लाख ७० टन एवढे झाले; पण भारत सरकारने तूर डाळ खरेदीसाठीचा करार आफ्रिकन देशातील मोझँकिक व इतर देशांसोबत केलेला असल्याने तूर डाळ देशात आयात करण्यात येत आहे. आयातीत तूर डाळीचे दर हे ४,५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. यावर तोडगा म्हणून केंद्र शासनाने प्रतिक्ंिवटल ५,२५० रुपये हमीदर जाहीर केले. यावर प्रतिक्ंिवटल २०० रुपये बोनसही जाहीर करू न नाफेडमाार्फत शासकीय तूर खरेदी सुरू केली. त्यासाठी शेतकºयांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करू न आॅनलाइन नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला एकरी दोन क्ंिवटल तूर खेरदीची मर्यादा टाकण्यात आली, नंतर शेतकºयांची नाराजी वाढताच ही मर्यादा एकरी चार व हेक्टरी १० क्ंिवटलपर्यंत वाढविण्यात आली.

 राज्यात तुरीचे उत्पादन वाढले आहे; पण दर कोसळले. शासनाने आयातीचा करार केला असल्याने आता तोे मोडता येत नाही. पाच वर्षांचा तो करार केला असेल, तोपर्यंत तूर आयात करावीच लागणार आहे. तसेच शासनाच्या तूर खरेदीची व्यवस्था दुरुस्त करणे क्रमप्राप्त आहे. तुरीचे मूल्यवर्धन करणे त्याहीपेक्षा गरजेचे आहे. तुरीला कीड लागण्यापूर्वी वेळापत्रक ठरवून तूर खरेदी करू न तुरीची डाळ करण्यासाठी डाळ गिरण्याकडे पाठविण्याची गरज आहे.डॉ. के.बा.वंजारी,इमेरिट्स सायन्टिस्ट (आयसीएआर, दिल्ली) तथा माजी विभाग प्रमुख,कडधान्य संशोधन विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी