शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दुष्काळाचे सावट, अन् पैसेवारी ६१ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:03 IST

अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीरसुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात  अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे मूग,  उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात  कमालीची घट होण्याची स्थिती असून, कपाशी पिकाच्या उत् पादनाचेही  खरे नाही.  पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी  संकटात सापडला असून, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील  सातही तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार   २0१७-१८ या वर्षातील जिल्ह्यातील खरीप पिकांची  नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सा तही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप  िपकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. नियमानुसार  खरीप पिकांची ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये  शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते; परंतु कमी  पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरले अस ताना, प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या  नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी नजरअंदाज  पैसेवारी ६१ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर  करण्यात आल्याने, आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली  असून, त्यामध्ये जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व गावांची  सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली. खरीप पिकांची  सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार  असून, अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार  आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत किती जाहीर केली जाते, याकडे आता  जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.