शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे सावट, अन् पैसेवारी ६१ पैसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:03 IST

अकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीरसुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे आहे. कमी पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन  बुडाल्याने, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट निर्माण झाले  असताना,  जिल्ह्यातील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी  पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले  जात आहे.यावर्षीचा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना, जिल्ह्यात  अद्यापही दमदार पाऊस झाला नाही. कमी पावसामुळे मूग,  उडिदाचे पीक हातून गेले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनात  कमालीची घट होण्याची स्थिती असून, कपाशी पिकाच्या उत् पादनाचेही  खरे नाही.  पिकांचे उत्पादन बुडाल्याने शेतकरी  संकटात सापडला असून, नापिकीमुळे जिल्ह्यात दुष्काळी  परिस्थितीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील  सातही तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार   २0१७-१८ या वर्षातील जिल्ह्यातील खरीप पिकांची  नजरअंदाज पैसेवारी २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आस् ितककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सा तही तालुक्यातील लागवडीयोग्य सर्व ९९0 गावांमधील खरीप  िपकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ६१ पैसे आहे. नियमानुसार  खरीप पिकांची ५0 पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये  शासनामार्फत दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते; परंतु कमी  पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट पसरले अस ताना, प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या  नजरअंदाज पैसेवारीनुसार जिल्ह्याची सरासरी नजरअंदाज  पैसेवारी ६१ पैसे म्हणजेच ५0 पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर  करण्यात आल्याने, आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर!  खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली  असून, त्यामध्ये जिल्ह्यातील लागवडीयोग्य सर्व गावांची  सरासरी पैसेवारी ६१ पैसे जाहीर करण्यात आली. खरीप पिकांची  सुधारित पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार  असून, अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार  आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी  जिल्हा प्रशासनामार्फत किती जाहीर केली जाते, याकडे आता  जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.