शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

By admin | Updated: March 10, 2017 18:31 IST

अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाºया किंवा शेतांमध्ये काम करणाºया मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

लोकमत ऑनलाइन 

मोहोळांपासून दुर राहा : वन्यजीव अभ्यासकांचा सल्लाअकोला : अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाऱ्या किंवा शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. गत आठवड्यात पातुर तालुक्यातील खेट्री परिसरात रस्त्याने जाणाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. वाशिम जिल्ह्यातील जांब शेतशिवारात बुधवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही गत आठवड्यात मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांद्वारे मानसांवर हल्ला करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला असता, या हल्ल्यांसाठी मधमाशांना झालेली धोक्याची जाणीव हे मुख्य कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांशी केलेल्या चर्चेतून समोर आले. घनदाट जंगले, शेतशिवार एवढेच नव्हे, तर पाण्याच्या टाक्या, पडक्या इमारती या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ लागलेले दिसतात. फुलांचे परागकण गोळा करून मोहोळात मध तयार करण्याचे काम मधमाशा सातत्याने करीत असतात. मधमाशांमध्ये राणी माशी व कामगार माशी असे दोन प्रकार आहेत. राणी माशी ही अंडी घालण्याचे काम करते, तर कामगार माशा या फुलांचे परागकण गोळा करून मध तयार करण्यात काम करतात. सध्या वसंत ऋतु असल्यामुळे सगळीकडे फुलांचे प्रमाण जास्त आहे. फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षीत ठिकाण पाहून मधमाशा मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाशांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माशांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी कामगार माशांना देते. त्यानंतर कामगार माशा त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, असे वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)तीव्र सुगंध करतो विचलितमधमाशांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशिल असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माशा विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाशा अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. मधमाशांची सिमा रेषा निश्चितमधमाशा या संवेदनशिल असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमा रेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाशा या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाशा या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.मधमाशा विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. मोहोळास धोका असल्याची जाणीव झाल्यानंतरच त्या हल्ला करतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुंगंध लावून जाण्याचे टाळावे. - गोविंद पांडे,वन्यजीव अभ्यासक, अकोला.