शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

By admin | Updated: March 10, 2017 18:31 IST

अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाºया किंवा शेतांमध्ये काम करणाºया मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

लोकमत ऑनलाइन 

मोहोळांपासून दुर राहा : वन्यजीव अभ्यासकांचा सल्लाअकोला : अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाऱ्या किंवा शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. गत आठवड्यात पातुर तालुक्यातील खेट्री परिसरात रस्त्याने जाणाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. वाशिम जिल्ह्यातील जांब शेतशिवारात बुधवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही गत आठवड्यात मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांद्वारे मानसांवर हल्ला करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला असता, या हल्ल्यांसाठी मधमाशांना झालेली धोक्याची जाणीव हे मुख्य कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांशी केलेल्या चर्चेतून समोर आले. घनदाट जंगले, शेतशिवार एवढेच नव्हे, तर पाण्याच्या टाक्या, पडक्या इमारती या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ लागलेले दिसतात. फुलांचे परागकण गोळा करून मोहोळात मध तयार करण्याचे काम मधमाशा सातत्याने करीत असतात. मधमाशांमध्ये राणी माशी व कामगार माशी असे दोन प्रकार आहेत. राणी माशी ही अंडी घालण्याचे काम करते, तर कामगार माशा या फुलांचे परागकण गोळा करून मध तयार करण्यात काम करतात. सध्या वसंत ऋतु असल्यामुळे सगळीकडे फुलांचे प्रमाण जास्त आहे. फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षीत ठिकाण पाहून मधमाशा मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाशांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माशांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी कामगार माशांना देते. त्यानंतर कामगार माशा त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, असे वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)तीव्र सुगंध करतो विचलितमधमाशांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशिल असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माशा विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाशा अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. मधमाशांची सिमा रेषा निश्चितमधमाशा या संवेदनशिल असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमा रेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाशा या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाशा या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.मधमाशा विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. मोहोळास धोका असल्याची जाणीव झाल्यानंतरच त्या हल्ला करतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुंगंध लावून जाण्याचे टाळावे. - गोविंद पांडे,वन्यजीव अभ्यासक, अकोला.