शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

धोक्याची जाणीव झाल्यामुळे मधमाशा करतात हल्ला!

By admin | Updated: March 10, 2017 18:31 IST

अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाºया किंवा शेतांमध्ये काम करणाºया मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत.

लोकमत ऑनलाइन 

मोहोळांपासून दुर राहा : वन्यजीव अभ्यासकांचा सल्लाअकोला : अलीकडच्या काही दिवसांमध्ये चवताळलेल्या मधमाशांनी रस्त्याने जाणाऱ्या किंवा शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. गत आठवड्यात पातुर तालुक्यातील खेट्री परिसरात रस्त्याने जाणाऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. वाशिम जिल्ह्यातील जांब शेतशिवारात बुधवारी मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्या. बुलडाणा जिल्ह्यातही गत आठवड्यात मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाशांद्वारे मानसांवर हल्ला करण्याच्या कारणांचा मागोवा घेतला असता, या हल्ल्यांसाठी मधमाशांना झालेली धोक्याची जाणीव हे मुख्य कारण असल्याचे वन्यजीव अभ्यासकांशी केलेल्या चर्चेतून समोर आले. घनदाट जंगले, शेतशिवार एवढेच नव्हे, तर पाण्याच्या टाक्या, पडक्या इमारती या ठिकाणी मधमाशांचे मोहोळ लागलेले दिसतात. फुलांचे परागकण गोळा करून मोहोळात मध तयार करण्याचे काम मधमाशा सातत्याने करीत असतात. मधमाशांमध्ये राणी माशी व कामगार माशी असे दोन प्रकार आहेत. राणी माशी ही अंडी घालण्याचे काम करते, तर कामगार माशा या फुलांचे परागकण गोळा करून मध तयार करण्यात काम करतात. सध्या वसंत ऋतु असल्यामुळे सगळीकडे फुलांचे प्रमाण जास्त आहे. फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षीत ठिकाण पाहून मधमाशा मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाशांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माशांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी कामगार माशांना देते. त्यानंतर कामगार माशा त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, असे वन्यजीव अभ्यासक गोविंद पांडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)तीव्र सुगंध करतो विचलितमधमाशांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशिल असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माशा विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाशा अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते. मधमाशांची सिमा रेषा निश्चितमधमाशा या संवेदनशिल असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमा रेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाशा या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाशा या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.मधमाशा विनाकारण कोणावरही हल्ला करत नाहीत. मोहोळास धोका असल्याची जाणीव झाल्यानंतरच त्या हल्ला करतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुंगंध लावून जाण्याचे टाळावे. - गोविंद पांडे,वन्यजीव अभ्यासक, अकोला.