शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

आचारसंहितेमुळे विकास कामे रखडली!

By admin | Updated: September 17, 2014 02:33 IST

मनपातील १४ कोटींच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची मंजुरी.

अकोला : शहरात मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी प्राप्त २६ कोटीच्या अनुदानाला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. मागील दीड वर्षांंपासून मनपात पडून असलेल्या २६ कोटींपैकी १४ कोटींच्या प्रस्तावाला नुकतीच विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली असली तरी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुन्हा एकदा विकास कामे लांबणीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. आचारसंहिता संपताच १९ ऑक्टोबरनंतर विकास कामांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. मनपा निवडणुकीच्या कालावधीत शहराची बकाल अवस्था लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी शहराचे पालकत्व स्वीकारले आणि मूलभूत सुविधा व विकास कामांसाठी २६ कोटींचे अनुदान वितरित केले. हा निधी मार्च २0१३ मध्ये मनपाला प्राप्त झाला; परंतु काँग्रेसप्रणीत आघाडीच्या अंतर्गत कलहामुळे या निधीचे नियोजन करण्यात पदाधिकार्‍यांसह प्रशासनाला अपयश आले. यात भरीस भर २६ कोटींच्या अनुदानात मॅचिंग फंड जमा करण्याची अट शासनाने नेमून दिल्याने ही अट रद्द करण्यासाठी सत्तापक्षाला जंगजंग पछाडावे लागले होते. उशिरा का होईना; परंतु सत्तापक्षासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे मॅचिंग फंडची अट शासनाने रद्द केली. यावर पदाधिकार्‍यांनी विकास कामांचे प्रस्ताव तयार केले. मनपाच्या महासभेत २६ कोटींपैकी ११ कोटी ८५ लाख रुपये पाणी पुरवठा योजना हस्तांतरणासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकरिता राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावास १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली असली तरी नेमकी याच दिवशी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे प्रशासनाला विकास कामांच्या निविदा काढणे आता शक्य नसल्यामुळे १९ ऑक्टोबरनंतर हा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.

** अन्यथा कामे झाली असती!

      विकास कामांसाठी १४ कोटींचा प्रस्ताव १८ जुलैच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला हो ता. यावर प्रशासनाने प्रस्तावाला विलंब केल्याने मंजुरीची पुढील प्रक्रिया रखडली. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रस्तावाला मंजुरी मिळाली असती, तर विकास कामांचा मार्ग मोकळा झाला असता, हे तेवढेच खरे.