शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बदलत्या जीवनशैलीमुळे चिमुकल्यांनाही मधुमेहाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 13:28 IST

अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे आज मधुमेह आजाराने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. प्रौढच नव्हे, तर लहान मुलांवरही मधुमेहाचे सावट आहे.

अकोला: बदलत्या जीवनशैलीमुळे आज मधुमेह आजाराने विक्राळ स्वरूप धारण केले आहे. प्रौढच नव्हे, तर लहान मुलांवरही मधुमेहाचे सावट आहे. चोरपावलांनी येणारा मधुमेह अन्य मोठ्या आजारांना आपोआपच निमंत्रण देतो. मधुमेह आणि त्यापासून उद्भवणाऱ्या व्याधींमुळे निर्माण झालेली समस्या आपल्या आजच्या पिढीसमोर एक मोठे आव्हानच ठरत आहे. त्यामुळे मधुमेहाचे धोके वेळीच ओळखणे गरजेचे आहे.देशात मधुमेह झपाट्याने पसरत आहे. अवघ्या १० व्या-१२ व्यावर्षी मुलांमध्ये दिसणारा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टरांना आव्हान देत आहे. २०२१ पर्यंत भारत मधुमेहाची राजधानी ठरणार, असा इशारा डब्ल्यूएचओ तसेच जागतिक मधुमेह संघाने दिला आहे. लहान मुलांमध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण आणि त्याचे काय परिणाम होत आहेत, चला तर जाणून घेऊया.लहान मुलांमधील वाढता मधुमेहमधुमेह फक्त प्रौढांपुरताच मर्यादित नसून, लहान मुलांनाही (०-१५ वर्षे) तो होऊ शकतो. ही बाब अद्यापही अनेकांना माहीत नाही. एकूण मधुमेहींपैकी सर्वसाधारणत: ९५ टक्के प्रौढ लोकांमध्ये आणि फक्त ५-६ टक्के लहान मुलांमध्ये असे प्रमाण काही वर्षांपूर्वी होते. तेच प्रमाण सध्या आठ टक्क्यांवरून १२-१३ टक्के इतके वाढले आहे. इन्शुलिन तयार करणाºया स्वादूपिंडातील बिटा पेशी जर पूर्णत: नष्ट झाल्या, तर हा आजार उद्भवतो. सर्वसाधारणत: जंतूंच्या प्रादुर्भावामुळे बिटा पेशींना नष्ट करणाºया अँटी बॉडिज आपल्या शरीरात तयार होतात आणि बिटा पेशी नष्ट होऊन मधुमेहाला सुरुवात होते. त्यामुळे रुग्णाचे वजन झपाट्याने कमी होते. लघवी, तहान फार लागते, मुले अगदी अशक्त होतात आणि वेळीच लक्षात न आल्यास रक्तातील शर्करा फार वाढते. आयुष्यभर दिवसातून २-३ आणि गरज असल्यास चार वेळाही इन्शुलिनचे इंजेक्शन घेण्यावाचून त्यांना काहीही पर्याय नसतो.

परिणामया आजारामुळे मुलांच्या दैनंदिन जीवनावर, मानसिकतेवर, शालेय जीवनावर पडतो. या आजारात त्या मुलांच्या खाण्याच्या वेळा, इन्शुलिनच्या वेळा, नियमित रक्त तपासणी, इतर तपासण्या यावर फार बारीक आणि नियमित लक्ष ठेवणे गरजेचे असते. छोट्याशा चुकीमुळे साखर एकदम कमी होऊन ही मुले एकदम आजारी होऊ शकतात आणि वेळेवर लक्षात न आल्यास बेशुद्धही होऊ शकतात.

 

टॅग्स :Akolaअकोलाdiabetesमधुमेह