शहरं
Join us  
Trending Stories
1
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
2
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
3
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
4
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
5
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
6
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
7
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
8
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
9
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
10
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
12
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
13
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
14
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
15
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
16
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
17
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
18
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
19
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
20
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास

राजकीय उदासीनतेत अडकला दोन जिल्ह्यांचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 02:18 IST

अकोला, वाशिम जिल्ह्यांतील १७३५ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रतीक्षा.

संतोष येलकर/अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावांचा समावेश करण्यात आला; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला व वाशिम या जिल्ह्यांतील १ हजार ७३५ गावांमध्ये अद्यापही दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये सत्ताधारी सेना-भाजपचे प्राबल्य असतानाही, केवळ राजकीय उदासीनतेमुळे या गावांचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश होऊ शकला नसल्याचे चित्र दिसत आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या राज्यातील १४ हजार ७0८ गावांमध्ये २0 ऑक्टोबर रोजीच्या शासननिर्णयानुसार दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नजरअंदाज पैसेवारीनुसार ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ५५ गावांचा, तर वाशिम व बुलडाणा या दोन जिल्ह्यांतील एकाही गावाचा समावेश करण्यात आला नव्हता. नोव्हेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीनुसार अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्ह्यांतील लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली, तसेच अंतिम पैसेवारीदेखील ५0 पैशांपेक्षा कमी आहे. लागवडयोग्य सर्व गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असल्याने, तीनही जिल्ह्यांतील सर्व गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शासनाच्या ९ नोव्हेंबर रोजीच्या परिपत्रकानुसार बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र सुधारित व अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असूनही दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील एकूण ९९७ पैकी केवळ ५५ गावे कायम ठेवण्यात आली, तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७९३ पैकी एकाही गावाचा दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. खरीप पिकांची ५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सर्व १ हजार ४२0 गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली; मात्र पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असलेल्या अकोला जिल्ह्यातील ९४२ आणि वाशिम जिल्ह्यातील ७९३ गावे अद्यापही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली नाहीत. सत्ताधारी आठ आमदार, मंत्री असूनही ह्यदुष्काळह्ण कायमच!अकोला जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे सहा, तर वाशिम जिल्ह्यात दोन आमदार आहेत. याशिवाय एक मंत्रीही अकोला जिल्ह्याला लाभला आहे. तरीही या दोन जिल्ह्यांतील सर्व गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात या लोकप्रतिनिधींना यश आले नाही. सक्षम प्रतिनिधीत्वाचा दुष्काळच या दोन्ही जिल्ह्यांच्या नशिबी असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.तीन जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावे!जिल्हा                      एकूण गावे            दुष्काळग्रस्त गावेअकोला                            ९९७               ५५बुलडाणा                        १४२0               १४२0वाशिम                            ७९३                 00