शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: January 11, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा वीस दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला; मात्र आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीकरिता विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी २१ डिसेंबर २0१५ रोजी मंजुरी दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या ४0१ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ९८१ उपाययोजनांच्या कामांकरिता १३ कोटी ८३ लाख ५३ हजार रुपयांचा निधी खर्च प्रस्तावित आहे. पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी; आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे करण्यासाठी एकूण ८९१ उपाययोजनांपैकी ८ जानेवारीपर्यंत केवळ दोन उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. उर्वरित उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते व जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिकांना देण्यात आले; परंतु पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली आहेत.