शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: January 11, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा वीस दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला; मात्र आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीकरिता विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी २१ डिसेंबर २0१५ रोजी मंजुरी दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या ४0१ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ९८१ उपाययोजनांच्या कामांकरिता १३ कोटी ८३ लाख ५३ हजार रुपयांचा निधी खर्च प्रस्तावित आहे. पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी; आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे करण्यासाठी एकूण ८९१ उपाययोजनांपैकी ८ जानेवारीपर्यंत केवळ दोन उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. उर्वरित उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते व जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिकांना देण्यात आले; परंतु पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली आहेत.