शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांचा ‘दुष्काळ’

By admin | Updated: January 11, 2016 01:58 IST

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली.

संतोष येलकर / अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा वीस दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला; मात्र आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी तालुका स्तरावरून प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील नदी-नाले आटले असून, धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे हिवाळ्यातच जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जानेवारी ते जून या कालावधीकरिता विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी २१ डिसेंबर २0१५ रोजी मंजुरी दिली. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यातल्या ४0१ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ९८१ उपाययोजनांच्या कामांकरिता १३ कोटी ८३ लाख ५३ हजार रुपयांचा निधी खर्च प्रस्तावित आहे. पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा मंजूर करण्यात आला असला तरी; आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांची कामे करण्यासाठी एकूण ८९१ उपाययोजनांपैकी ८ जानेवारीपर्यंत केवळ दोन उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले. उर्वरित उपाययोजनांच्या कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते व जिल्हा परिषद भूजल सर्वेक्षण विभागाच्या भूवैज्ञानिकांना देण्यात आले; परंतु पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या ९७९ उपाययोजनांची कामे रखडली आहेत.