शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित; सवलती लागू करण्यास मंजुरी!

By संतोष येलकर | Updated: November 11, 2023 19:16 IST

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित

अकोला :

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याचा शासन निर्णय शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ५१ महसूल मंडळांचा समावेश असून, या मंडळांमध्ये सवलती लागू होणार आहेत.

राज्यातील दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसूल मंडळांत जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मी.पेक्षा कमी झाले आहे, अशा राज्यातील १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत १० नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्यास मंजुरी दिलेल्या राज्यातील महसूल मंडळांच्या यादीत अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील ५१ महसूल मंडळांचा समावेश असून, जिल्ह्यातील या मंडळांमध्ये सवलती लागू होणार आहेत.जिल्ह्यातील ‘या’ महसूल मंडळांचा आहे समावेश !अकोला तालुका : अकोला, घुसर, दहीहांडा, कापशी, उगवा, आगर, बोरगावमंजू, पळसो बु., सांगळूद, कुरणखेड व शिवणी.अकोट तालुका : अकोट, मुंडगाव, पणज, चोहोट्टा, कुटासा, आसेगाव बाजार, उमरा व अकोलखेड.तेल्हारा तालुका : तेल्हारा, हिवरखेड, अडगाव बु., पाथर्डी, पंचगव्हाण, माळेगाव बाजार.बाळापूर तालुका : बाळापूर, पारस, वहाळा, वाडेगाव, उरळ बु., निंबा, हातरुण.बार्शिटाकळी तालुका : बार्शिटाकळी, राजंदा, धाबा, पिंजर, खेर्डा बु., महान.पातूर तालुका : पातूर, बाभुळगाव, आलेगाव, चान्नी, सस्ती.मूर्तिजापूर तालुका : मूर्तिजापूर, हातगाव, निंबा, माना, शेलूबाजार, लाखपुरी, कुरुम, जामठी.‘या’ सवलती होणार लागू !दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील संबंधित महसूल मंडळांमध्ये जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या विजबिलात ३३.५ टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती लागू होणार आहेत.