शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात ‘पंदेकृवि’चा सामंजस्य करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 10:51 IST

Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ठरणार वरदानतणांचे नियंत्रण व कापूस वेचणी होणार सोयीस्कर

अकोला : कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार झाला. कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कापूस पिकांमधील तणांचे नियंत्रण व वेचणीसंदर्भात हा करार करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात हा सामंजस्य करार ७ एप्रिल रोजी झाला. याप्रसंगी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विलास भाले, ज्योश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी कापूस वेचणीसह कीड-रोगांचे नियंत्रण, तणांचे-खतांचे नियोजन आदी मुख्य बाबींवर त्यांनी कापूस उत्पादकांच्या समस्या उलगडल्या आणि कापूस पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर होण्यासाठी विविध केंद्रीय संस्था, कृषी विद्यापीठे, खासगी संस्था आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले. तसेच यावेळी कापूस पिकासाठी यंत्रमानव उपलब्ध झाल्यास वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी कापूस वेचणीसह तण नियंत्रणासंदर्भातील अभिनव प्रयोग विदर्भात होत असल्याचे सांगितले. ठाण्याच्या ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स या कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले, तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे यांनी यंत्रमानव निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला व त्यांच्या उच्चशिक्षित सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या कार्यात

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तांत्रिक सहकार्य करून सर्वार्थाने उपयुक्त यंत्रमानव निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. या उपक्रमात विद्यापीठाच्या सहयोगाने विविध तांत्रिक बाजू बळकट करण्यात येत असून माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे (सल्लागार समितीचे अध्यक्ष), डॉ. सुहास वाणी, विजय लाडोळे व अरविंद नळकांडेंसारख्या शेतीतज्ज्ञांचे पाठबळ असल्याचे उपस्थितांना सांगितले.

याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी अरविंद नळकांडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन सहसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. नीलकंठ पोटदुखे, कृषीविद्या विभागप्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, तणशास्त्र तज्ज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी आदींची उपस्थिती होती.

  

 

ही कामे करू शकेल यंत्रमानव

कृषी यंत्रमानव हा कापसाच्या लागवडीचे पूर्ण यांत्रिकीकरण करेल, त्यात तणनिर्मूलन, कीटक रोग निर्मूलन तसेच कापसाची वेचणी ही सर्व कामे कृषी यंत्रमानव करेल, अशा यंत्रमानवाने शेतकऱ्याची हेक्टरी आर्थिक बचत होत फायदा वाढून, नवीन पिढी शेतीकडे आकर्षित होईल, असे डॉ. लोहकरे यांनी सांगितले.

 

जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत यंत्रमानवाची निर्मिती प्रगतिपथावर आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या तीन पेटंट्साठी कंपनीने अर्ज केला आहे. जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲॅग्रीकल्चर रोबोट हा भारतात बनणार असल्याचे डॉ.लोहकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला