शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात ‘पंदेकृवि’चा सामंजस्य करार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 10:51 IST

Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapith : कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ठरणार वरदानतणांचे नियंत्रण व कापूस वेचणी होणार सोयीस्कर

अकोला : कापूस पिकासाठी यंत्रमानव निर्मितीसंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स ठाणे यांच्यात सामंजस्य करार झाला. कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करीत कापूस पिकांमधील तणांचे नियंत्रण व वेचणीसंदर्भात हा करार करण्यात आला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कुलगुरू कार्यालयाच्या सभागृहात हा सामंजस्य करार ७ एप्रिल रोजी झाला. याप्रसंगी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. विलास भाले, ज्योश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी कापूस वेचणीसह कीड-रोगांचे नियंत्रण, तणांचे-खतांचे नियोजन आदी मुख्य बाबींवर त्यांनी कापूस उत्पादकांच्या समस्या उलगडल्या आणि कापूस पिकामध्ये यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर होण्यासाठी विविध केंद्रीय संस्था, कृषी विद्यापीठे, खासगी संस्था आदी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले. तसेच यावेळी कापूस पिकासाठी यंत्रमानव उपलब्ध झाल्यास वरदान ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी कापूस वेचणीसह तण नियंत्रणासंदर्भातील अभिनव प्रयोग विदर्भात होत असल्याचे सांगितले. ठाण्याच्या ज्योश आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सोल्युशन्स या कंपनीने सहा महिन्यांपासून इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट (कृषी यंत्रमानव) बनवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीवर आधारित तंत्रज्ञान वापरून हा कृषी यंत्रमानव लवकरच शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले, तर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरदचंद्र लोहोकरे यांनी यंत्रमानव निर्मितीचा प्रवास उलगडून सांगितला व त्यांच्या उच्चशिक्षित सहकाऱ्यांनी हाती घेतलेल्या कार्यात

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तांत्रिक सहकार्य करून सर्वार्थाने उपयुक्त यंत्रमानव निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त केला. या उपक्रमात विद्यापीठाच्या सहयोगाने विविध तांत्रिक बाजू बळकट करण्यात येत असून माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे (सल्लागार समितीचे अध्यक्ष), डॉ. सुहास वाणी, विजय लाडोळे व अरविंद नळकांडेंसारख्या शेतीतज्ज्ञांचे पाठबळ असल्याचे उपस्थितांना सांगितले.

याप्रसंगी प्रगतिशील शेतकरी अरविंद नळकांडे, कृषी विद्यापीठाचे संशोधन सहसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, कापूस संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. नीलकंठ पोटदुखे, कृषीविद्या विभागप्रमुख डॉ. एन. डी. पार्लावार, सेंद्रिय शेती तंत्रज्ञान प्रकल्पाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. शैलेश ठाकरे, तणशास्त्र तज्ज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी आदींची उपस्थिती होती.

  

 

ही कामे करू शकेल यंत्रमानव

कृषी यंत्रमानव हा कापसाच्या लागवडीचे पूर्ण यांत्रिकीकरण करेल, त्यात तणनिर्मूलन, कीटक रोग निर्मूलन तसेच कापसाची वेचणी ही सर्व कामे कृषी यंत्रमानव करेल, अशा यंत्रमानवाने शेतकऱ्याची हेक्टरी आर्थिक बचत होत फायदा वाढून, नवीन पिढी शेतीकडे आकर्षित होईल, असे डॉ. लोहकरे यांनी सांगितले.

 

जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर रोबोट भारतात

कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेत यंत्रमानवाची निर्मिती प्रगतिपथावर आहे. या नवीन तंत्रज्ञानाच्या तीन पेटंट्साठी कंपनीने अर्ज केला आहे. जगातील पहिला इंटिग्रेटेड ॲॅग्रीकल्चर रोबोट हा भारतात बनणार असल्याचे डॉ.लोहकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोला