शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
2
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
3
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
4
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
5
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
6
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
7
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
8
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
9
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
10
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
11
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
12
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
13
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
15
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
16
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
17
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
20
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव

२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

By admin | Updated: September 14, 2016 02:16 IST

अकोला मनपाच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावांचे सर्वेक्षण होणार.

आशिष गावंडे अकोला, दि. १३: अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. आता मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतच्या २४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे केला जाईल.संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने अमृत योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने शहराची पाणीपुरवठा योजना गृहित धरून २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर तयार केला. मुख्य अभियंता कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर सदर प्रकल्प अहवाल मजीप्राच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आला. यादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. साहजिकच, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्येदेखील अमृत योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या वितरण प्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यानुषंगाने मजीप्राने तयार केलेल्या डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. मनपासमोर वान धरणाचा पर्याय२0११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या २४ गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजार असून, यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये किमान ४0 ते ५0 हजारांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येकी १३५ लीटर पाणीपुरवठा केला जाईल. २४ गावे आणि शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. २५ टक्के हिस्सा जमा करावा लागेलपाणीपुरवठा योजनेच्या एकूण कि मतीमध्ये २५ टक्के रकमेचा हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागेल. ही रक्कम टप्प्याटप्प्यानुसार जमा केली जाणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.मनपाकडून घेणार 'डाटा'मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाने जमा केली आहे. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली जाईल. त्यानंतर २४ गावांत सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.