शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

By admin | Updated: September 14, 2016 02:16 IST

अकोला मनपाच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावांचे सर्वेक्षण होणार.

आशिष गावंडे अकोला, दि. १३: अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. आता मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतच्या २४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे केला जाईल.संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने अमृत योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने शहराची पाणीपुरवठा योजना गृहित धरून २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर तयार केला. मुख्य अभियंता कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर सदर प्रकल्प अहवाल मजीप्राच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आला. यादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. साहजिकच, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्येदेखील अमृत योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या वितरण प्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यानुषंगाने मजीप्राने तयार केलेल्या डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. मनपासमोर वान धरणाचा पर्याय२0११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या २४ गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजार असून, यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये किमान ४0 ते ५0 हजारांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येकी १३५ लीटर पाणीपुरवठा केला जाईल. २४ गावे आणि शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. २५ टक्के हिस्सा जमा करावा लागेलपाणीपुरवठा योजनेच्या एकूण कि मतीमध्ये २५ टक्के रकमेचा हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागेल. ही रक्कम टप्प्याटप्प्यानुसार जमा केली जाणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.मनपाकडून घेणार 'डाटा'मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाने जमा केली आहे. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली जाईल. त्यानंतर २४ गावांत सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.