शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

२५४ कोटींच्या पाणीपुरवठा योजना ‘डीपीआर’ बदलणार !

By admin | Updated: September 14, 2016 02:16 IST

अकोला मनपाच्या हद्दवाढीमुळे समाविष्ट गावांचे सर्वेक्षण होणार.

आशिष गावंडे अकोला, दि. १३: अमृत योजनेंतर्गत संपूर्ण शहराची पाणीपुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. आता मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहरालगतच्या २४ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेचा सर्व्हे केला जाईल.संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीत बदल करण्यासाठी शासनाने अमृत योजनेंतर्गत कोट्यवधींच्या निधीची तरतूद केली आहे. महान धरण ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलणे, मोर्णा प्रकल्प ते महान धरणापर्यंत जलवाहिनी टाकणे, शहरातील मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलणे आदींसह विविध कामांचा समावेश आहे. योजनेचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम शासन स्तरावरून थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला देण्यात आले. मजीप्राने शहराची पाणीपुरवठा योजना गृहित धरून २५४ कोटी रुपये किमतीचा डीपीआर तयार केला. मुख्य अभियंता कार्यालयाने हिरवी झेंडी दिल्यानंतर सदर प्रकल्प अहवाल मजीप्राच्या मुंबईस्थित मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्यात आला. यादरम्यान, ३१ ऑगस्ट रोजी शासनाने मनपाच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी केली. साहजिकच, मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांमध्येदेखील अमृत योजनेतून पाणीपुरवठय़ाच्या वितरण प्रणालीत सुधारणा करावी लागणार आहे. त्यानुषंगाने मजीप्राने तयार केलेल्या डीपीआरमध्ये पुन्हा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. मनपासमोर वान धरणाचा पर्याय२0११ च्या जनगणनेनुसार शहरालगतच्या २४ गावांची लोकसंख्या १ लक्ष १२ हजार असून, यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये किमान ४0 ते ५0 हजारांनी वाढ झाल्याचा अंदाज आहे. शहराच्या लोकसंख्येतही वाढ झाली आहे. ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत नागरिकांना प्रत्येकी १३५ लीटर पाणीपुरवठा केला जाईल. २४ गावे आणि शहराची लोकसंख्या लक्षात घेतल्यास काटेपूर्णा (महान) प्रकल्पातील आरक्षित जलसाठा कमी पडण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी वान धरणाचा पर्याय समोर येऊ शकतो. २५ टक्के हिस्सा जमा करावा लागेलपाणीपुरवठा योजनेच्या एकूण कि मतीमध्ये २५ टक्के रकमेचा हिस्सा मनपा प्रशासनाला जमा करावा लागेल. ही रक्कम टप्प्याटप्प्यानुसार जमा केली जाणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर बोजा पडणार नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे.मनपाकडून घेणार 'डाटा'मनपा क्षेत्रात समाविष्ट झालेल्या २४ गावांतील पाणीपुरवठा योजनेची माहिती मनपाच्या जलप्रदाय विभागाने जमा केली आहे. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून घेतली जाईल. त्यानंतर २४ गावांत सर्वेक्षण करून नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.