शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

तुम्ही सरकारच्या निधीची चिंता करू नका, नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST

अकाेला : अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले आहे. अकाेला शहरासह चार तालुक्यांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नियमांवर ...

अकाेला : अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले आहे. अकाेला शहरासह चार तालुक्यांत नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. अशा स्थितीत प्रशासनाने नियमांवर बाेट ठेवून काम करू नये. शासनाची मदत करण्याची तयारी आहे. शासनाकडून येणाऱ्या निधीची तुम्ही चिंता करू नका. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करा, अतिवृष्टी व पूरग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवा, अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांनी शासन निर्णयांचा दिला दाखला

अतिवृष्टीमध्ये घरांचे माेठे नुकसान झाले आहे, तर अनेक गावांमधील शेती खरडून गेली असून पिके वाहून गेली. त्यामुळे प्रत्येकाला मदत मिळाली पाहिजे, मदतीपासून काेणीही वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिल्यावर, काही अधिकाऱ्यांनी नियमांच्या मर्यादा सांगण्यास सुरुवात करताच, पालकमंत्र्यांनी मदतीबाबतच्या शासन निर्णयांचा दाखला देत, प्रशासनालाच आरसा दाखविला. आढावा बैठकीला येण्यापूर्वी पालकमंत्री अभ्यास करून आले हाेते याची जाणीव हाेताच नियमांवर बाेट ठेवत बाेलणाऱ्या अधिकाऱ्यांचा सूर नंतर बदलला.

मोरणा नदीचे खोलीकरण अन् ड्राेनद्वारे सर्वेक्षण

अतिवृष्टीमुळे मोरणा नदीला पुन्हा पूर येऊ नये याकरिता जिल्ह्यालगत असलेल्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करा, यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश यावेळी दिले. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे व पिकांचे मोठ्‌या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून अहवाल सादर करा. मदतीपासून कोणीही वंचित राहता कामा नये, याकरिता प्रशासनाने प्राधान्याने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.