शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनपाच्या शाळेला बेघरांचा निवारा बनवू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:13 IST

शहरातील बेघर व्यक्तींसाठी महापालिका प्रशासनाने अकाेटफैल पाेलिस ठाण्यासमाेरील मनपाच्या हिंदी शाळा क्रमांक ३ मध्ये तात्पुरता निवारा उभारला आहे. स्वयंसेवी ...

शहरातील बेघर व्यक्तींसाठी महापालिका प्रशासनाने अकाेटफैल पाेलिस ठाण्यासमाेरील मनपाच्या हिंदी शाळा क्रमांक ३ मध्ये तात्पुरता निवारा उभारला आहे. स्वयंसेवी संस्थेमार्फत हा उपक्रम राबविला जात असला तरी अनेक बेघर व्यक्ती या ठिकाणी न थांबता शहरात उघड्यावर राहणे पसंत करतात. त्यामुळे मनपाच्या उद्देशालाच नख लागले आहे. अशास्थितीत आता संपूर्ण जिल्हाभरातील बेघर व्यक्तींसाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी महापालिकेच्या शाळेची निवड केली आहे. रामदासपेठ स्थित टेम्पल गार्डनमधील मनपा उर्दू मुलांची शाळा क्रमांक ३ व मराठी मुलांची शाळा क्रमांक ४ मध्ये विद्यार्थ्यांची माेठी पटसंख्या असतानासुध्दा या शाळेतील विद्यार्थी रेल्वे स्टेशन चाैकातील जुन्या व शिकस्त इमारतीचा समावेश असलेल्या शाळा क्रमांक २१ मध्ये स्थानांतरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. हा विचित्र प्रकार पाहता विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आराेप करीत शुक्रवारी आक्रमण युवक संघटनेच्यावतीने मनपा आयुक्त निमा अराेरा यांच्याकडे निवेदन सादर केले.

निर्णय रद्द करा!

टेम्पल गार्डनमधील शाळेत गरीब कुटुंबातील २५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी १५ शिक्षक सेवारत आहेत. विद्यार्थ्यांचे स्थानांतरण केल्यास चिमुकल्या विद्यार्थ्यांसमाेर व त्यांच्या कुटुंबीयांसमाेर अनेक समस्या निर्माण हाेतील. त्यामुळे या शाळेत बेघरांचा निवारा उभारण्याचा निर्णय पालकमंत्र्यांसह महापालिका प्रशासनाने रद्द करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.