शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या

By आशीष गावंडे | Updated: May 4, 2025 00:01 IST

Akola Double Murder Case: पत्नीवरील लाख रुपयाचे कर्ज नवऱ्याने फेडले, तरीही दोघांमध्ये सुरु होते वाद

Akola Double Murder Case: आशिष गावंडे, अकोला: घरगुती वाद विकाेपाला गेल्यामुळे क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या सावत्र मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी अकोल्यातील तारफैल परिसरातील सिद्धार्थ नगरमध्ये उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी रामदास पेठ पाेलिसांनी आराेपी पतीला अटक केली आहे. सुरज गणवीर (३७, रा. सिद्धार्थ नगर, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. त्याने पत्नी अश्विनी (२८) व मुलगी आराेही (३) यांची गळा दाबून हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी ही सूरज याची दुसरी पत्नी हाेती. अश्विनीला पहिल्या पतीपासून आराेही ही मुलगी हाेती. मागील काही दिवसांपासून या दाेघांमध्ये सतत घरगुती वाद हाेऊन भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी आराेपी सूरज हा जेवण करण्यासाठी घरी आला हाेता. ताे जेवण करत असतानाच अश्विनीने वादाला सुरुवात केली. वाद वाढत गेल्याने सुरजने प्रथम पत्नीचा दुपट्टयाने गळा दाबून खून केला व त्यानंतर त्याच पद्धतीने तीन वर्षीय सावत्र मुलीचाही गळा दाबून जीव घेतला.

घटनेची माहिती मिळताच शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी तसेच रामदासपेठ पाेलिस स्टेशनचे प्रभारी पाेलिस निरीक्षक अरुण परदेशी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वाेपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. रामदासपेठ पोलिसांनी आरोपी सुरज गणवीर याला अटक केली असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • आराेपीने पाेलिसांना दिली माहिती- पत्नी व मुलीची हत्या केल्यानंतर आराेपी सुरजने रामदासपेठ पाेलिसांना खून केल्याची माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठले असता आराेपी घरी बसून हाेता. पत्नी अश्विनी सुरजसाेबत विविध मुद्यांवरुन नेहमी वाद घालत असायची अशी माहिती पाेलिसांनी दिली.
  • मुलांना सावत्र वागणूक- अश्विनीसोबत लग्न झाल्यानंतरही, सूरजची पहिल्या पत्नीपासूनची मुले त्याच्या घरी येत असत. तेव्हा अश्विनी त्यांच्याशी तुसडेपणाने वागत असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, अश्विनीवर जवळपास एक लाख रुपयांचे कर्ज होते, जे सूरजने स्वतःच्या खर्चाने फेडले होते. तरीदेखील त्यांच्यातील वाद आणि तणाव कायम हाेता. मुलांना अश्विनीकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याने सूरज तणावात हाेता.
  • मृतदेहांच्या तोंडात घातला शेवटचा घास- पत्नी आणि मुलीचा खून केल्यानंतर आराेपी सूरजने या दाेघींच्या ताेंडात जेवणाचा शेवटचा घास घातला. पोलिसांनी पंचनामा सुरू केला, तेव्हा दोघींच्या तोंडात पाेळी व भाजीचा घास दिसून आला.
टॅग्स :Akolaअकोला