शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

वनशास्त्र पदवीधरांना हवे शंभर टक्के आरक्षण !

By admin | Updated: February 10, 2016 02:05 IST

इतर राज्यांमध्ये ५0 ते ७0 टक्के; राज्यात मात्र ५ टक्के.

अकोला: वनशास्त्र पदवीधरांसाठी इतर राज्यांमध्ये वनविभागाच्या नोकरीत ५0 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे; परंतु राज्यात केवळ पाच टक्केच आरक्षण देण्यात आले. त्यामुळे या पदवीधरांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. वनविभागातील विविध खात्यांमध्ये वनशास्त्र पदवीधरांना १00 टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत वनशास्त्राची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने भारतातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वनशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुरू केला. महाराष्ट्रातही अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात १९८५-८६ मध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. १९८८ च्या वनधोरणानुसार केंद्र सरकारने वनशास्त्र पदवीधरांना राज्याच्या वनविभागात सामावून घेण्याचे सूचित केले आहे तसेच २00६ मध्ये राष्ट्रीय वन आयोगाने दिलेल्या शिफारशीमध्ये राज्य सरकारांनी वनक्षेत्रपाल व सहायक वनसंरक्षक भरती, वनविद्या अभ्यासक्रम शिकविणार्‍या विद्यापीठांतील वनशास्त्र पदवीधरांमधूनच करावी, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आतापर्यंत या दोन्ही विद्यापीठांमधून हजारो विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडलेत. या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात वनव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, वन्यजीवशास्त्र, वनसंरक्षण, वनकायदा यांसारखे विषय शिकविले जातात तसेच या विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांचे वनव्यावसायिक प्रशिक्षणही पूर्ण केले जाते. असे असतानाही त्यांना वनविभागात सामावून घेतले जात नाही. दरवर्षी या दोन्ही विद्यापीठांमधून ६४ विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडतात. वनविभागात दर तीन किंवा चार वर्षांनंतर पदभरती होते. त्यात वनशास्त्र पदवीधरांसाठी केवळ पाच टक्केच आरक्षण असल्यामुळे तीन किंवा चार पदवीधरच सेवेत सामावून घेतले जातात. त्यामुळे वनविभागातील विविध खात्यांमध्ये वनशास्त्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के आरक्षण देण्याची मागणी विद्यार्थी संघटनेने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.विविध राज्यांमध्ये वनशास्त्र पदवीधरांसाठी असलेले आरक्षणतामिळनाडू           ५0 टक्केहिमाचल प्रदेश       ७0 टक्केकेरळ                    २५ टक्केकर्नाटक                ७0 टक्केजम्मू-काश्मीर       ५0 टक्केओडिशा                ३0 टक्केगुजरात                 २५ टक्केमहाराष्ट्र                 0५ टक्केवनमंत्र्यांच्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे साखळी उपोषणआपल्या मागणीसाठी वनशास्त्र पदवीधरांनी १२ जानेवारीपासून वनमंत्र्यांचा गृहजिल्हा असलेल्या चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. यामध्ये २00 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.