शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना फक्त पॅसेंजर रेल्वेतूनच पसरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पृष्ठभूमीवर आतापर्यंत कठोर असलेले निर्बंध सैल झाले असून, सर्वच व्यवहार सुरळीत ...

अकोला : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याच्या पृष्ठभूमीवर आतापर्यंत कठोर असलेले निर्बंध सैल झाले असून, सर्वच व्यवहार सुरळीत होत आहेत. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असताना रेल्वेची प्रवासी वाहतूक मात्र अजूनही पूर्ववत झालेली नाही. कोरोना संसर्गाच्या नावाखाली अजूनही विशेष गाड्या चालविण्यात येत असून, पॅसेंजर गाड्या बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ पॅसेंजर गाड्यांमधूनच कोरोनाचा प्रसार होता का, असा सवाल आता सामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यात सध्या केवळ विशेष गाड्या धावत असून, या गाड्यांमध्ये केवळ आरक्षण केलेल्यांनाच प्रवास करता येतो. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्यांची गोची होत आहे. शिवाय आरक्षण तिकीट महाग असल्याने सर्वसामान्यांच्या खिशालाही कात्री लागत आहे. अशा परिस्थितीत पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जनसामान्यांमधून होत आहे.

सध्या सुरू असलेल्या फेस्टिव्हल स्पेशल गाड्या

कुर्ला-हावडा

ओखा-हावडा

पोरबंदर-हावडा

सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्या

अमरावती-मुंबई

हावडा-अहमदाबाद

नागपूर-पुणे

कोल्हापूर-गोंदिया

नांदेड-श्रीगंगानगर

हापा-बिलासपूर

मग पॅसेंजर बंद का?

भुसावळ-नरखेड

वर्धा-भुसावळ

नागपूर-भुसावळ

अकोला-पूर्णा

अकोला-परळी

एक्स्प्रेसचा प्रवास परवडत नाही

आरक्षित डब्यांमध्ये प्रवासी प्रवास करू शकतात. या डब्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम पाळले जातातच, हे छातीठोकपणे सांगता येत नाही. मग पॅसेंजर गाड्या का सुरू केल्या जात नाहीत. केवळ या गाड्यांमध्येच कोरोनाचा प्रसार होतो व विशेष गाड्यांमध्ये नाही, असाच अर्थ निघतो. सामान्यांचा विचार करून पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत.

- मनीष निचळे, गांधीग्राम, जि. अकोला

एक्स्प्रेस व विशेष गाड्यांना छोट्या स्थानकांवर थांबे नाहीत. शिवाय दैनंदिन पास व इतर सवलतींचाही लाभ मिळत नाही. नजीकचा प्रवास करण्यासाठी पॅसेंजर गाड्या उपयुक्त होत्या. आता या गाड्या बंद असल्याने आमच्यासारख्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेने पॅसेंजर गाड्या सुरू केल्या पाहिजेत.

- गजानन शेंडे, गोपालखेड, जि. अकोला