मनोज पाटील मलकापूर(जि. बुलडाणा),दि. २८: मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत; परंतु शेतीचा दवाखानाही असू शकतो ही स्वप्नवत कल्पना बुलडाणा जिल्हय़ातील मलकापूर शहरात साकारल्या जात आहे. येथील शेती तज्ज्ञ गणेश विठ्ठल पाटील हे कमी खर्चात शेतीपासून भरघोस उत्पादन शेतकर्यांना कसे मिळवून देता येईल, या दृष्टीने झटत असून त्यांचे हे कार्य आजच्या घडीला निश्चितच वाखाणण्याजोगे ठरत आहे.गणेश पाटील यांचे मूळ गाव दाताळा असून त्यांचे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगपर्यंंंत झालेले आहे. शिक्षणानंतर पुणे येथे ९ वर्ष वीज वितरण कंपनीत नोकरी, त्यानंतर शेतीविषयक वस्तू विक्रीचा व्यवसाय, विद्युत वाहिन्या उभारणीची कामे, उपसा जलसिंचनाची कामे करीत असताना शे तकरी बांधवांशी त्यांचा सातत्याने संपर्क जुळत राहिला. दरम्यान, शेती व्यवसाय परवडत नाही, शेती व्यवसाय म्हणजे जीवघेणा व्यवसाय अशी नकारार्थी भावना त्यांना नेहमीच कानावर पडत होती. या प्रकाराने ते उद्विग्न होत होते. त्यानंतर सन १९९६ ला ते इस्राइल देशात कृषी प्रदर्शनाला गेले. तेथे त्यांनी शेतातील नवनवीन बदल व बदलत्या काळानुरूप शेतीचे प्रयोग प्रत्यक्ष पाहिले. दरम्यानच्या काळात त्यांनी मूळ गावी दाताळा येथे येऊ न १५ एकर शेतीला आता कसायचे हा चंग मनी बांधला. प्रथम वर्षीच त्यातील ३ एकरमध्ये ५0 हजार रुपये खर्च करून केळीचे पीक घेतले. केळीच्या उत्पादनातून ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. सदर उत्पन्न म्हणजेच त्या शेतीची खरेदी किंमतच.शेतकर्यांना आधार२0११ पासून मलकापूर शहरातील बुलडाणा रोडवर शेतकर्यातील हरवलेली उमेद जागे करण्याकरिता शेतीचा दवाखान सुरू केला. येथे खनिज द्रव्य, घ्युमिक अँसिड, फल्विक अँसिड, समुद्र वनस्पती अर्क, संजीवके, केवोलीन, विद्राव्य करण्यासाठी रसायने शेतकर्यांना पिकाच्या पानांची तपासणी करुन उ पलब्ध करून दिली जातात. तसेच शेती संदर्भातील मार्गदर्शन व सल्लासुद्धा दिला जातो.
पिकांवर उपचार करणारा डॉक्टर!
By admin | Updated: August 28, 2016 23:26 IST