शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा भाववाढीचा फायदा शेतक-यांना नव्हे व्यापा-यांनाच!

By admin | Updated: August 26, 2015 00:56 IST

शेतक-यांकडे कांदाच नाही.

विवेक चांदूरकर /अकोला : सध्या देशात कांद्याच्या भाववाढीवरून रणकंदन माजले असून, या भाववाढीमुळे शेतकर्‍यांना फायदा होत असेल तर विरोध का होत असल्याचे आरोप प्रत्यारोपही होत आहेत. मात्र, शेतकर्‍यांनी केवळ हजार ते पंधराशे रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे कांद्याची विक्री केली असून, चार ते साडे चार हजार रुपये प्रतिक्विंटलचा मलिदा व्यापारी लाटत आहेत. या भाववाढीचा शेतकर्‍यांना कवडीचाही फायदा होत नसून, व्यापारी मालामाल होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कांद्याच्या भावात वाढ झाली. सध्या कांदा ७0 रुपये किलो बाजारपेठेत ग्राहकांना मिळत आहे. या भाववाढीमुळे मोठय़ा प्रमाणात ग्राहकांकडून ओरड केल्या जात आहे. दुसरीकडे शेतकरी नेते व शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे भासविणारे नेते कांद्याचे भाव वाढल्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होत असेल तर आकांडतांडव कशासाठी, असा आरोप करीत आहेत. कांदा उत्पादन घेणारे ९0 टक्के शेतकरी कांद्याची साठवणूक करीत नाही. कांद्याची साठवणूक केली तर कांद्याला सड लागते. तसेच कांदा सुकल्यानंतर त्याचे वजन कमी होते. कांद्याची साठवणूक करण्यासाठी उच्च दर्जाचे शीतगृह, गोडाऊन, कांदाचाळ आवश्यक असते. शेतकर्‍यांकडे याची व्यवस्था नसल्यामुळे कांद्याची साठवणूक करण्यात येत नाही. दरवर्षी कांद्याच्या भावात वाढ होत असल्यामुळे व्यापारी कांद्याची मोठय़ा प्रमाणात साठवणूक करतात. त्यामुळे बाजारपेठेत टंचाई निर्माण होते व आपोआपच भाववाढ होते. त्यानंतर व्यापारी चढय़ा भावाने कांद्याची विक्री करतात व मलिदा लाटतात. राज्यात कांद्याची पेरणी खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीन हंगामात केली जाते. विदर्भात प्रामुख्याने रब्बी हंगामात तर नाशिकमध्ये तीनही हंगामात कांद्याचे उत्पादन घेतल्या जाते. गतवर्षी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे उत्पादनात घट झाली. याचे नुकसान तर शेतकर्‍यांना सोसावे लागले; मात्र कांद्याला हजार ते पंधराशे रुपये क्विंटलनेच भाव मिळाला. व्यापार्‍यांना मात्र प्रतिक्विंटल ४ हजार रुपये नफा मिळत आहे. *सोशल मीडियावर 'कांदा वॉर'सध्या सोशल मीडियावर कांद्याच्या भाववाढीवरून अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कांद्याचे महत्त्व अधोरेखित करणारे छायाचित्र व व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात लाइक व शेअर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे हा शेतकर्‍यांचा अपमान असून, यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोपही होत आहे.