शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा जिल्हा परिषदांवर भरवसा नाही का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:44 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.

ठळक मुद्देशिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या थेट शाळेवर न करता जिल्हा परिषदेच्या ठिकाणी करण्यात झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेवर पदस्थापना देण्यात आली. आंतरजिल्हा बदलीने थेट शाळा न देता फक्त जिल्हा बदल करण्यात आला. त्यामुळे ती बदली प्रक्रिया यशस्वी ठरली. त्याचवेळी जिल्हय़ांतर्गत बदल्या करताना राज्य स्तरावरून करण्यात आल्या. हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था विश्‍वासार्ह नाहीत, जिल्हा परिषदेतील संवैधानिक पदाधिकारी व  सक्षम प्रशासकीय अधिकार्‍यांची यंत्रणा  कुचकामी आहे का, असा आरोपही निवेदनात करण्यात आला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार गोठवण्याचाही हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. संवर्ग २ मध्ये बदली अर्ज भरताना ३0 किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या (जोडीदार  कोणत्याही खात्यात सेवेत असल्यास) शिक्षकांनी अर्ज केला आहे. त्यामध्ये ३0 किमीच्या अंतरात पती-पत्नी असलेल्यांना खो बसला आहे. फक्त जिल्हा परिषद शिक्षक असल्यास त्यांनाच अर्ज सादर करता येणार, असे या २७ फेब्रुवारीच्याच्या शासन निर्णयात नमूद असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्याचवेळी जे पती-पत्नी ३0 किलोमीटरच्या आत असलेल्यांची बदली झाल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागत आहे.  संवर्ग १ मध्ये बदली किंवा त्यातून सूट घेण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज केला आहे. तसेच गंभीर आजारांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह  शारीरिक तपासणी जे. जे. रुग्णालय, मुंबई वैद्यकीय बोर्डाकडून करावी, त्यांचे प्रमाणपत्र खोटे निघाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिक्षकांनी केली आहे. संवर्ग दोनमध्ये ३५ किमीपेक्षा अंतर कमी असताना ते जास्त दाखवून बदली अर्ज करण्यात आला, त्याची पडताळणी करून कारवाई करावी, जिल्हय़ांतर्गत शिक्षक बदलीबाबतच्या संदिग्ध शासन निणर्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी व दिवाळीच्या सुट्या विनाकारण वाया जात आहेत, या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होत असून, त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीचे शशिकांत गायकवाड, संजय भाकरे, नामदेव फाले, जव्वाद हुसेन, प्रकाश चतरकर, संतोष महल्ले, केशव मालोकार  विजय भोरे, देवानंद मोरे, रजनीश ठाकरे, महादेव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदनातून केली आहे.