शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

शासनाचा जिल्हा परिषदांवर भरवसा नाही का..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:44 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.

ठळक मुद्देशिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या इतर सर्व पदांच्या संवर्गातील कर्मचार्‍यांच्या बदल्या येथेच समुपदेशनाने करण्यात आल्या. त्याचवेळी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या राज्य स्तरावरून ऑनलाइन होत आहेत. या प्रकाराने शासनाचा जिल्हा परिषदांवर भरोसा नाही का, असा प्रश्न जिल्हय़ातील शिक्षक समन्वय समितीने निवेदनातून विचारला आहे.शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या थेट शाळेवर न करता जिल्हा परिषदेच्या ठिकाणी करण्यात झाल्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेवर पदस्थापना देण्यात आली. आंतरजिल्हा बदलीने थेट शाळा न देता फक्त जिल्हा बदल करण्यात आला. त्यामुळे ती बदली प्रक्रिया यशस्वी ठरली. त्याचवेळी जिल्हय़ांतर्गत बदल्या करताना राज्य स्तरावरून करण्यात आल्या. हा प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था विश्‍वासार्ह नाहीत, जिल्हा परिषदेतील संवैधानिक पदाधिकारी व  सक्षम प्रशासकीय अधिकार्‍यांची यंत्रणा  कुचकामी आहे का, असा आरोपही निवेदनात करण्यात आला. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार गोठवण्याचाही हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. संवर्ग २ मध्ये बदली अर्ज भरताना ३0 किमीपेक्षा जास्त अंतर असलेल्या (जोडीदार  कोणत्याही खात्यात सेवेत असल्यास) शिक्षकांनी अर्ज केला आहे. त्यामध्ये ३0 किमीच्या अंतरात पती-पत्नी असलेल्यांना खो बसला आहे. फक्त जिल्हा परिषद शिक्षक असल्यास त्यांनाच अर्ज सादर करता येणार, असे या २७ फेब्रुवारीच्याच्या शासन निर्णयात नमूद असताना त्याचे उल्लंघन केले जात आहे. त्याचवेळी जे पती-पत्नी ३0 किलोमीटरच्या आत असलेल्यांची बदली झाल्याने त्यांना विस्थापित व्हावे लागत आहे.  संवर्ग १ मध्ये बदली किंवा त्यातून सूट घेण्यासाठी काही शिक्षकांनी दिव्यांगाच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज केला आहे. तसेच गंभीर आजारांचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या शिक्षकांच्या प्रमाणपत्रासह  शारीरिक तपासणी जे. जे. रुग्णालय, मुंबई वैद्यकीय बोर्डाकडून करावी, त्यांचे प्रमाणपत्र खोटे निघाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही शिक्षकांनी केली आहे. संवर्ग दोनमध्ये ३५ किमीपेक्षा अंतर कमी असताना ते जास्त दाखवून बदली अर्ज करण्यात आला, त्याची पडताळणी करून कारवाई करावी, जिल्हय़ांतर्गत शिक्षक बदलीबाबतच्या संदिग्ध शासन निणर्यामुळे शिक्षकांच्या उन्हाळी व दिवाळीच्या सुट्या विनाकारण वाया जात आहेत, या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षकांवर अन्याय होत असून, त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीचे शशिकांत गायकवाड, संजय भाकरे, नामदेव फाले, जव्वाद हुसेन, प्रकाश चतरकर, संतोष महल्ले, केशव मालोकार  विजय भोरे, देवानंद मोरे, रजनीश ठाकरे, महादेव तायडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदनातून केली आहे.