शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका

By admin | Updated: July 15, 2017 01:28 IST

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगाम-२०१७ बाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आढावा घेतला. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका. पीक विम्याबाबत जनजागृती करून पीक विम्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा. कर्जमाफी निकषांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, अकोलाचे उपविभागीय कृषी अधिकारी ए.डी. कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक सु.ल. बावीस्कर, महाबीजचे व्यवस्थापक क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापक प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अरुण गावंडे आदींसह सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सातही जिल्ह्यात आजपर्यंत झालेले पर्जन्यमान, पीक पेरणी, तक्रार निवारण कक्ष, खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री व उपलब्धता तसेच तक्रारी, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा तसेच दुबार पेरणी याबाबत तालुकानिहाय आढावा घेतला. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासू देऊ नका, अशी सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. गैरप्रकाराची तक्रार आल्यास भरारी पथकाने तत्काळ कारवाई करावी. बियाणे, खते, कीटकनाशकांची पारदर्शक पद्धतीनेच विक्री करण्यात यावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. पीक विम्याच्या कक्षेत शेतकऱ्यांना आणण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करून वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. अकोला जिल्ह्यात एकूण सरासरी पर्जन्यमान ६९७.३ मिमी आहे. १३ जुलै २०१७ पर्यंत १६३.८ मिमी इतका पाऊस झाला आहे. पेरणीचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ४,८३,८८० हेक्टर इतके असून सध्या २,५७,४५४ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अवैधरीत्या बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर तालुकानिहाय सात भरारी पथकांची स्थापना केली आहे. याच पद्धतीने तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली.सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आठवड्यातुन कमीतकमी दोन दिवस प्रत्यक्ष स्थळी पाहणी करावी. तसेच नजर अंदाज नोंदी यांची प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा कराव्या जेणेकरून तुरी प्रमाणे अंदाज चुकणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.- रणजित पाटील, पालकमंत्री