शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका

By admin | Updated: July 15, 2017 01:28 IST

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खरीप हंगाम-२०१७ बाबत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आढावा घेतला. शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांची कमतरता भासू देऊ नका. पीक विम्याबाबत जनजागृती करून पीक विम्याचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा. कर्जमाफी निकषांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री यांच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे, अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, अकोलाचे उपविभागीय कृषी अधिकारी ए.डी. कुलकर्णी, आत्माचे प्रकल्प संचालक सु.ल. बावीस्कर, महाबीजचे व्यवस्थापक क्षीरसागर, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग महामंडळाचे व्यवस्थापक प्रकाश राठोड, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अरुण गावंडे आदींसह सर्व तालुक्यांचे कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी सातही जिल्ह्यात आजपर्यंत झालेले पर्जन्यमान, पीक पेरणी, तक्रार निवारण कक्ष, खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री व उपलब्धता तसेच तक्रारी, कृषी यांत्रिकीकरण, पीक विमा तसेच दुबार पेरणी याबाबत तालुकानिहाय आढावा घेतला. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासू देऊ नका, अशी सूचना करून पालकमंत्री म्हणाले की, बियाणे, खते, कीटकनाशके यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. गैरप्रकाराची तक्रार आल्यास भरारी पथकाने तत्काळ कारवाई करावी. बियाणे, खते, कीटकनाशकांची पारदर्शक पद्धतीनेच विक्री करण्यात यावी, यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे. पीक विम्याच्या कक्षेत शेतकऱ्यांना आणण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती करून वेळेत उद्दिष्ट पूर्ण करावे. शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. अकोला जिल्ह्यात एकूण सरासरी पर्जन्यमान ६९७.३ मिमी आहे. १३ जुलै २०१७ पर्यंत १६३.८ मिमी इतका पाऊस झाला आहे. पेरणीचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ४,८३,८८० हेक्टर इतके असून सध्या २,५७,४५४ हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अवैधरीत्या बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर तालुकानिहाय सात भरारी पथकांची स्थापना केली आहे. याच पद्धतीने तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली.सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आठवड्यातुन कमीतकमी दोन दिवस प्रत्यक्ष स्थळी पाहणी करावी. तसेच नजर अंदाज नोंदी यांची प्रत्यक्ष पाहणी करून शहानिशा कराव्या जेणेकरून तुरी प्रमाणे अंदाज चुकणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.- रणजित पाटील, पालकमंत्री