शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

शेतक-यांकडून कर्जवसुली सक्तीने करु नका!

By admin | Updated: December 29, 2014 01:57 IST

अकोला जिल्ह्यातील बँक अधिका-यांना निर्देश.

संतोष येलकर /अकोलाशेतीशी निगडित कर्जाची शेतकर्‍यांकडून सक्तीने वसुली करू नये, असे निर्देश जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील बँक अधिकार्‍यांना दिले.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक हातून गेले तसेच दुबार-तिबार पेरणी करूनही सोयाबीन उगवले नाही. उगवलेल्या सोयाबीन पिकाचे उत्पादन एकरी ५0 किलो ते एक क्विंटलच्यावर झाले नाही. कपाशीचे उत्पादनही बुडाले असून, पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने रब्बी पिकांचेही खरे नाही. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. नापिकीच्या स्थितीत जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये खरीप पिकांची सुधारित पैसेवारी सरासरी ४१ पैसे असल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी गत १५ नोव्हेंबर रोजी जाहीर केले तसेच ५0 पैशांपेक्षा पैसेवारी कमी असल्याने, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँक व व्यापारी बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. टंचाई परिस्थितीत शेतीशी निगडित शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमबजावणी करून,शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली करू नये, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी बँकांच्या अधिकार्‍यांना दिले. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक टी. डी. गायकवाड यांच्यासह विविध ३५ बँकांचे अधिकारी उपस्थित होते. टंचाई परिस्थितीत शेतकर्‍यांकडील कर्ज वसुलीस शासन निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून, शेतकर्‍यांकडून कर्जवसुलीसाठी सक्ती करण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्ह्यातील बँकांना देण्यात आले. याशिवाय शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेल्या कर्जाचे रूपांतरण करून, कर्ज वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वाटप करण्यात आलेले कर्ज!हंगाम                शेतकरी                   रक्कमखरीप                १,११,४३३            ७0७ कोटी ३८ लाखरब्बी                       ४४७                  ४ कोटी 0३ लाख....................................एकूण               १,११,८८0              ७११ कोटी ४१ लाख