शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

मराठा मोर्चांच्या विरोधात प्रतिमोर्चे काढू नका- आंबेडकर

By admin | Updated: September 14, 2016 01:59 IST

मराठा समाजाच्या मोर्चास प्रतिरोध न करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे अवाहन.

अकोला, दि. १३ : कोपर्डी घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजाचे प्रत्येक जिल्हह्यात मूक मोर्चे निघत आहेत. जसा आपल्याला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, तसा तो मराठा समाजाचाही कायदेशीर हक्क आहे. आपल्या मागण्यांसाठी शांततामय मार्गाने काढण्याचा हक्क राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना दिला आहे. त्या विरोधात आंबेडकरी समाजाने प्रतिमोर्चे काढण्याची गरज नाही असे आवाहन भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अँड.आंबेडकर यांच्या वतिने जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की मराठा समाजाचे हे महामोर्चे सरकारच्या विरोधात आहेत. आजवर ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांच्या विरोधात आंबेडकरी एससी, एसटी समाजात प्रतिरोधक प्रतिक्रिया उमटत नसल्याचे पाहून मराठा मोर्चाला शह देण्यासाठी आंबेडकरी-दलित-आदिवासी समाजात आरएसएस मोठा गैरसमज पसरवित आहे. याला आंबेडकरी एससी, एसटी समाजाने बळी पडू नये, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. देशात अनेक राज्यांत आंबेडकरी, दलित, आदिवासी आणि मुस्लीम समाजातील लोकांवर अनेक अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशातील भारिप बहुजन महासंघ, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित दलित शोषण मुक्ती मंच, भारतीय शेत मजदूर युनियन, नॅशनल कॅम्पेन कौन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ दलित राईट्स आणि विविध समतावादी, परिवर्तनवादी संघटनांच्या पुढाकाराने देशपातळीवर ह्यदलित स्वाभिमानी संघर्ष मंचह्णच्यावतीने १६ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात निदर्शन करण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.