शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

वायुसेनेच्या यशाचे राजकारण नको -  अबू आझमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 13:36 IST

लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.

अकोला: पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला व त्यानंतर वायुसेनेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये, या यशाचे राजकारणही करू नये, असे आवाहन करतानाच लष्करी कारवाई व पुलवामा हल्ल्यांच्या संदर्भात झालेल्या घडामोडींवर शंका-प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांसमोर पुरावे सादर करून त्यांची तोंडे बंद करावी, सत्य समोर आणावे, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी पत्रकार परिषदेत केली.अकोल्यातील जाफरी पार्क मैदानावर आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी आ. अबू आझमी शुक्रवारी अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले, की पुलवामा येथील घटना व लष्कराने केलेली यशस्वी कारवाई याचे सत्ताधारी पक्षाकडून होत असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राइकचा अभिमानच आहे; मात्र या कारवाईत जे दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगण्यात येते, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने सत्य समोर येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. वायुसेनेच्या कारवाईचे श्रेय कोणी घेऊ नये, युद्ध हा उपाय नसून, दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. त्यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सै. मोहिन, प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारुख, परवेज सिद्धिकी, महिला आघाडी प्रमुख माया चवरे यांच्यासह सपाचे पदाधिकारी बादशाह सेठ, सैयद अली व महेमूद खान उपस्थित होते. समविचारी पक्षांसोबत, अन्यथा स्वबळावर लढणार!भाजपच्या पराभवासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असून, यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी दिला. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. अ‍ॅड. आंबेडकर यांची कार्यशैली माहीत असल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीत सहभागी होणार नाही, असे स्पष्ट करतानाच काँग्रेस आघाडीने जागा न सोडल्यास स्वबळावर ४८ जागांवर लढणार, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणAbu Azmiअबू आझमी