शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

कर्जमाफीच्या कामात हलगर्जी करू नका!

By admin | Updated: July 13, 2017 01:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश : पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवारपर्यंत सादर करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सांगत कर्जमाफीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवार, १५ जुलैपर्यंत सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय मुख्य अधिकारी श्रीकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. कर्जमाफी योजनेसंदर्भात शासन निर्णयातील निकषांप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंबंधी अडचणी असल्यास मांडाव्यात; मात्र कर्जमाफीच्या कामात हलगर्जीपणा करू नये आणि जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती १५ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात दिरंगाई केल्यास कारवाई! यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असल्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत उद्दिष्टाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले. पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी दिला.पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा!पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्या व बँकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या कामासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची मदत घेण्याचे सांगत पीक विमा योजनेंतर्गत कामाचा दर आठवड्यात आढावा घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.