शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कर्जमाफीच्या कामात हलगर्जी करू नका!

By admin | Updated: July 13, 2017 01:03 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश : पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवारपर्यंत सादर करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या कामात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे सांगत कर्जमाफीच्या कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती शनिवार, १५ जुलैपर्यंत सादर करण्याचा ‘अल्टिमेटम’देखील जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय मुख्य अधिकारी श्रीकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत जिल्ह्यातील कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. कर्जमाफी योजनेसंदर्भात शासन निर्णयातील निकषांप्रमाणे बँकांनी वेळेत कार्यवाही करणे आवश्यक आहे. यासंबंधी अडचणी असल्यास मांडाव्यात; मात्र कर्जमाफीच्या कामात हलगर्जीपणा करू नये आणि जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले. कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती १५ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.पीक कर्ज वाटपात दिरंगाई केल्यास कारवाई! यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात १ लाख १४ हजार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे; परंतु अद्याप जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक कर्जाच्या लाभापासून वंचित असल्याच्या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत उद्दिष्टाप्रमाणे ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले. पीक कर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी दिला.पीक विम्याचा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा!पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्या व बँकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या कामासाठी कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची मदत घेण्याचे सांगत पीक विमा योजनेंतर्गत कामाचा दर आठवड्यात आढावा घेतला जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.