शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

एकही पात्र शेतकरी कर्जमाफीतून सुटू नये!

By admin | Updated: July 8, 2017 02:22 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना निर्देश: थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शानानाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटता कामा नये, असे निर्देश देत कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी सायंकाळी बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सन २००९ ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केली आहे. या योजनेत पात्र थकबाकीदार शेतकरी दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीस पात्र ठरणार आहेत. या पृष्ठभूमीवर कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील पात्र एकही शेतकरी सुटणार नाही, याबाबत दक्षता घेऊन पात्र थकबाकीदार सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिले, तसेच कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती तातडीने गोळा करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत बँकांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे, रिझर्व्ह बँकेचे एलडीओ राजशेखरन, नाबर्डचे राजेंद्र वाळके यांच्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी उपस्थित होते.पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होऊ नये!यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला. खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सांगत पीक कर्जासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत बँकांनी खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांना दिले.१२ जुलै रोजी घेणार आढावा!कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील बँकांच्या कामाचा आढावा आणि पीक कर्ज वाटपाच्या कामाचा आढावा १२ जुलै रोजी आयोजित बैठकीत घेण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना सांगितले.